शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथोपियातील ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
4
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
5
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
6
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
7
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
9
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
10
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
11
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
12
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
13
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
14
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
15
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
16
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
17
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
18
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
19
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
20
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मंदीचा रेल्वेलाही जबरदस्त फटका; माहिती अधिकारामुळे नुकसानीचा आकडा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 09:20 IST

मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती.

नवी दिल्ली : देशभरात आलेल्या मंदीच्या लाटेमुळे वाहन उद्योगांपासून अनेक उद्योगांनी गेल्या दोन महिन्यांत अनेकदा कंपन्या बंद ठेवल्या आहेत. तर अनेक कामगारांना कामावरून कमी केले आहे. या उत्पादन घटविल्याचा फटका रेल्वेलाही सोसावा लागला आहे. यंदाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीमध्ये रेल्वेला प्रवासी भाड्यातून 155 कोटी रुपये आणि मालवाहतुकीतून तब्बल 3901 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. माहिती अधिकारात हा तोटा समोर आला असून याचे मुख्य कारण देशात मंदी असल्याने मालवाहतूक घटल्याचे समजते. 

मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती. यानुसार रेल्वेला पहिल्या तिमाहीमध्ये प्रवासी भाड्याचून 13,398.92 कोटींची कमाई झाली होती. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये 13,243.81 कोटींची कमाई झाली. तर पहिल्या तिमाहीमध्ये मालभाडे 29,066.92 कोटींचे होते. हे भाडे घटून 25,165.13 कोटी रुपयांचे झाले आहे. 

तिकिट विक्रीमध्येही घटगेल्या वर्षीच्या तिकिट विक्रीशी तुलना करता यंदा यामध्ये 1.27 टक्क्यांची घट झाली आहे. तर उपनगरीय तिकिटांच्या विक्रीमध्ये 1.13 टक्क्यांची घट झाली आहे. 

रेल्वे खात्याने मंदीमुळे झालेल्या नुकसानीवर मात करण्यासाठी काही पाऊले उचलली आहेत. नुकताच त्यांनी सिझनचा अधिभार बंद केला आहे. तर एसी आणि एक्झीक्युटिव्ह श्रेणीच्या तिकिटांवर 25 टक्क्यांची सूट दिली आहे. तसेच इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी 30 वर्षे जुनी इंजिने बंद करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यातच रेल्वेने 17 झोनच्या मुख्यालयांना पत्र लिहून मंदीला रोखण्याची सूचना केली आहे. तसेच कोळशाच्या खाणींच्या क्षेत्रात पूर आल्याने कोळसा वाहतूकही कमी झाली आहे. मंदीने इस्पात आणि सिमेंट उद्योगाचेही कंबरडे मोडले आहे. यामुळे या मालाचीही वाहतूक मंदावली आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMONEYपैसा