शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

मंदीचा रेल्वेलाही जबरदस्त फटका; माहिती अधिकारामुळे नुकसानीचा आकडा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 09:20 IST

मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती.

नवी दिल्ली : देशभरात आलेल्या मंदीच्या लाटेमुळे वाहन उद्योगांपासून अनेक उद्योगांनी गेल्या दोन महिन्यांत अनेकदा कंपन्या बंद ठेवल्या आहेत. तर अनेक कामगारांना कामावरून कमी केले आहे. या उत्पादन घटविल्याचा फटका रेल्वेलाही सोसावा लागला आहे. यंदाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीमध्ये रेल्वेला प्रवासी भाड्यातून 155 कोटी रुपये आणि मालवाहतुकीतून तब्बल 3901 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. माहिती अधिकारात हा तोटा समोर आला असून याचे मुख्य कारण देशात मंदी असल्याने मालवाहतूक घटल्याचे समजते. 

मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती. यानुसार रेल्वेला पहिल्या तिमाहीमध्ये प्रवासी भाड्याचून 13,398.92 कोटींची कमाई झाली होती. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये 13,243.81 कोटींची कमाई झाली. तर पहिल्या तिमाहीमध्ये मालभाडे 29,066.92 कोटींचे होते. हे भाडे घटून 25,165.13 कोटी रुपयांचे झाले आहे. 

तिकिट विक्रीमध्येही घटगेल्या वर्षीच्या तिकिट विक्रीशी तुलना करता यंदा यामध्ये 1.27 टक्क्यांची घट झाली आहे. तर उपनगरीय तिकिटांच्या विक्रीमध्ये 1.13 टक्क्यांची घट झाली आहे. 

रेल्वे खात्याने मंदीमुळे झालेल्या नुकसानीवर मात करण्यासाठी काही पाऊले उचलली आहेत. नुकताच त्यांनी सिझनचा अधिभार बंद केला आहे. तर एसी आणि एक्झीक्युटिव्ह श्रेणीच्या तिकिटांवर 25 टक्क्यांची सूट दिली आहे. तसेच इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी 30 वर्षे जुनी इंजिने बंद करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यातच रेल्वेने 17 झोनच्या मुख्यालयांना पत्र लिहून मंदीला रोखण्याची सूचना केली आहे. तसेच कोळशाच्या खाणींच्या क्षेत्रात पूर आल्याने कोळसा वाहतूकही कमी झाली आहे. मंदीने इस्पात आणि सिमेंट उद्योगाचेही कंबरडे मोडले आहे. यामुळे या मालाचीही वाहतूक मंदावली आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMONEYपैसा