शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

मंदीचा रेल्वेलाही जबरदस्त फटका; माहिती अधिकारामुळे नुकसानीचा आकडा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 09:20 IST

मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती.

नवी दिल्ली : देशभरात आलेल्या मंदीच्या लाटेमुळे वाहन उद्योगांपासून अनेक उद्योगांनी गेल्या दोन महिन्यांत अनेकदा कंपन्या बंद ठेवल्या आहेत. तर अनेक कामगारांना कामावरून कमी केले आहे. या उत्पादन घटविल्याचा फटका रेल्वेलाही सोसावा लागला आहे. यंदाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीमध्ये रेल्वेला प्रवासी भाड्यातून 155 कोटी रुपये आणि मालवाहतुकीतून तब्बल 3901 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. माहिती अधिकारात हा तोटा समोर आला असून याचे मुख्य कारण देशात मंदी असल्याने मालवाहतूक घटल्याचे समजते. 

मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती. यानुसार रेल्वेला पहिल्या तिमाहीमध्ये प्रवासी भाड्याचून 13,398.92 कोटींची कमाई झाली होती. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये 13,243.81 कोटींची कमाई झाली. तर पहिल्या तिमाहीमध्ये मालभाडे 29,066.92 कोटींचे होते. हे भाडे घटून 25,165.13 कोटी रुपयांचे झाले आहे. 

तिकिट विक्रीमध्येही घटगेल्या वर्षीच्या तिकिट विक्रीशी तुलना करता यंदा यामध्ये 1.27 टक्क्यांची घट झाली आहे. तर उपनगरीय तिकिटांच्या विक्रीमध्ये 1.13 टक्क्यांची घट झाली आहे. 

रेल्वे खात्याने मंदीमुळे झालेल्या नुकसानीवर मात करण्यासाठी काही पाऊले उचलली आहेत. नुकताच त्यांनी सिझनचा अधिभार बंद केला आहे. तर एसी आणि एक्झीक्युटिव्ह श्रेणीच्या तिकिटांवर 25 टक्क्यांची सूट दिली आहे. तसेच इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी 30 वर्षे जुनी इंजिने बंद करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यातच रेल्वेने 17 झोनच्या मुख्यालयांना पत्र लिहून मंदीला रोखण्याची सूचना केली आहे. तसेच कोळशाच्या खाणींच्या क्षेत्रात पूर आल्याने कोळसा वाहतूकही कमी झाली आहे. मंदीने इस्पात आणि सिमेंट उद्योगाचेही कंबरडे मोडले आहे. यामुळे या मालाचीही वाहतूक मंदावली आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMONEYपैसा