शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्नाटकातील बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम; पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:58 IST

सत्ताधारी आघाडीतील १५ बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम राहिल्याने कर्नाटकमधील राजकीय नाट्याचा तिढा रविवारीही कायम राहिला.

बंगळुरु : सत्ताधारी आघाडीतील १५ बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम राहिल्याने कर्नाटकमधील राजकीय नाट्याचा तिढा रविवारीही कायम राहिला. ‘परत आलात तर तुमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील’, असे गाजर दाखवून काँग्रेसने बंडखोरांना परत आणण्याचा खूप आटापिटा केला, पण सोडून गेलेला एकही आमदार राजीनामा मागे घेण्यास राजी झाला नाही. उलट शनिवारच्या १५ तासांच्या वाटाघाटीनंतर जे स्वत: राजीनामा मागे घेऊन इतरांनाही सोबत घेऊन परत येतील, अशी काँग्रेसला खात्र होती ते एम. टी. नागराजही मुंबईला निघून गेले.काँग्रसचे वजनदार संकटमोचक डी. के. शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांना राजीनामे मागे घेण्यासाठी त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे गाजर दाखवितानाच विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सहभागी न झाल्यास अपात्रतेच्या कारवाईची धमकीही दिली. राजीनामा दिलेले परंतु मुंबईस न गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रामलिंग रेड्डी यांनीही ‘राजीनाम्याविषयी काहीच बोलणार नाही’, असे सांगितले. काँग्रेसच्या आशावादावर विरजण टाकले. त्यांच्या मुलीनेही आमदारकीचा राजीनामा दिला असून तिचा निर्णय ती घेईल, असे रेड्डी म्हणाले.कुमारस्वामी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाण्यासाठी राजीनामे दिलेल्या आमदारांनी त्यावेळी सभागृहात न फरकणेही पुरेसे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने मनाई केल्याने आपल्या राजीनाम्यांवर निदान मंगळवारपर्यंत तरी निर्णय होणार नाही या खात्रीने त्यांच्या मुंबईतच राहण्याच्या मनसुब्याला बळ मिळाले आहे.>‘राजीनामा द्या, अन्यथा विश्वासदर्शक ठराव मांडा’मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बहुमत गमावले असल्याने त्यांनी एकतर लगेच सन्मानाने राजीनामा द्यावा अन्यथा दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवारीच विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा, असा आग्रह भाजपचे विरोधीपक्षनेते बी. एस. येदियुरप्पा यांनी लावून धरला. त्यासोबतच मुंबईत तळ ठोकलेल्या बंडखोर आमदारांनी किमान बुधवारपर्यंत तरी बंगळुरात न परतण्याचे ठाम संकेत दिल्याने विश्वासदर्शक ठराव मांडला तरी तो जिंकायचा कसा, ही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची डोकेदुखी कायम आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामी