शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्नाटकातील बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम; पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:58 IST

सत्ताधारी आघाडीतील १५ बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम राहिल्याने कर्नाटकमधील राजकीय नाट्याचा तिढा रविवारीही कायम राहिला.

बंगळुरु : सत्ताधारी आघाडीतील १५ बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम राहिल्याने कर्नाटकमधील राजकीय नाट्याचा तिढा रविवारीही कायम राहिला. ‘परत आलात तर तुमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील’, असे गाजर दाखवून काँग्रेसने बंडखोरांना परत आणण्याचा खूप आटापिटा केला, पण सोडून गेलेला एकही आमदार राजीनामा मागे घेण्यास राजी झाला नाही. उलट शनिवारच्या १५ तासांच्या वाटाघाटीनंतर जे स्वत: राजीनामा मागे घेऊन इतरांनाही सोबत घेऊन परत येतील, अशी काँग्रेसला खात्र होती ते एम. टी. नागराजही मुंबईला निघून गेले.काँग्रसचे वजनदार संकटमोचक डी. के. शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांना राजीनामे मागे घेण्यासाठी त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे गाजर दाखवितानाच विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सहभागी न झाल्यास अपात्रतेच्या कारवाईची धमकीही दिली. राजीनामा दिलेले परंतु मुंबईस न गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रामलिंग रेड्डी यांनीही ‘राजीनाम्याविषयी काहीच बोलणार नाही’, असे सांगितले. काँग्रेसच्या आशावादावर विरजण टाकले. त्यांच्या मुलीनेही आमदारकीचा राजीनामा दिला असून तिचा निर्णय ती घेईल, असे रेड्डी म्हणाले.कुमारस्वामी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाण्यासाठी राजीनामे दिलेल्या आमदारांनी त्यावेळी सभागृहात न फरकणेही पुरेसे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने मनाई केल्याने आपल्या राजीनाम्यांवर निदान मंगळवारपर्यंत तरी निर्णय होणार नाही या खात्रीने त्यांच्या मुंबईतच राहण्याच्या मनसुब्याला बळ मिळाले आहे.>‘राजीनामा द्या, अन्यथा विश्वासदर्शक ठराव मांडा’मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बहुमत गमावले असल्याने त्यांनी एकतर लगेच सन्मानाने राजीनामा द्यावा अन्यथा दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवारीच विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा, असा आग्रह भाजपचे विरोधीपक्षनेते बी. एस. येदियुरप्पा यांनी लावून धरला. त्यासोबतच मुंबईत तळ ठोकलेल्या बंडखोर आमदारांनी किमान बुधवारपर्यंत तरी बंगळुरात न परतण्याचे ठाम संकेत दिल्याने विश्वासदर्शक ठराव मांडला तरी तो जिंकायचा कसा, ही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची डोकेदुखी कायम आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामी