शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बंडखोरांना ५ वर्षे निवडणूकबंदी करावी; ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 06:22 IST

पायलट व भाजप यांना अप्रत्यक्ष कोपरखळ्या मारत सिब्बल यांनी लिहिले: लशीची गरज आहे.

नवी दिल्ली : निवडणुकीत मतदारांचा बहुमताचा पाठिंबा मिळवून सत्तेवर आलेले सरकार पाडण्यासाठी बंडखोरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाच वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यास व कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालावी, असे मत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी व्यक्त केले.

सचिन पायलट यांनी १८ आमदारांसह गेहलोत सरकारविरुद्ध केलेले बंड व यास भाजपची असलेली कथित फूस यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार सध्या अस्थिरतेच्या अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर ट्विट करून सिब्बल यांनी हे मत माडले.

पायलट व भाजप यांना अप्रत्यक्ष कोपरखळ्या मारत सिब्बल यांनी लिहिले: लशीची गरज आहे. भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून लोकनियुक्त सरकारे पाडण्याचा विषाणू वुहानच्या धर्तीवर दिल्लीतही शिरला आहे. त्याला अटकाव करण्यासाठी राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टात (पक्षांतरबंदी कायदा) दुरुस्ती करणे आणि अशी बंडखोरी करणाऱ्या सर्वांना निवडणूक लढण्यास किंवा कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यास पाच वर्षे बंदी घालणे हाच रामबाण उपाय आहे.आपण भाजपमध्ये जाणार नाही, असे पायलट यांनी गुरुवारी म्हटल्यावर सिब्बल यांनी लगेच त्यांना उद्देशून ट्विट केले होते की, तुमच्या ‘घर वापसी’चे काय झाले व राजस्थानचे बंडखोर आमदार भगव्या पक्षाच्या (भाजप) देखरेखीखाली हरियाणात सहलीला गेले आहेत की काय?

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक