शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हरयाणात बंडखोरांनी वाढविली भाजप, काँग्रेसची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 01:25 IST

हरयाणात विधानसभा निवडणुकीत सतारूढ भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी बंडखोर डोकेदुखी ठरत आहेत. अनेक बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राज्यात २१ रोजी मतदान होणार आहे.

चंदीगड : हरयाणात विधानसभा निवडणुकीत सतारूढ भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी बंडखोर डोकेदुखी ठरत आहेत. अनेक बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राज्यात २१ रोजी मतदान होणार आहे.रेवाडीतील भाजपचे विद्यमान आमदार रणधीर कापडीवास यांनी सांगितले की, आपण अपक्ष निवडणूक लढविणार आहोत. गुडगावचे भाजप आमदार उमेश अग्रवाल यांनी पत्नी अनिता यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविले आहे. देवीलाल यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे नेते रणजित सिंह चौटाला तिकीट न मिळाल्याने रानियामधून अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. काही मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी बंडखोर थेट निवडणुकीत उतरले नाहीत; पण त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडाचे निशाण फडकाविले आहे. भाजपने कापडीवास यांच्याविरुद्ध सुनील मुसेपूर यांना तिकीट दिले आहे. आपण निवडणूक का लढवीत आहात? असे विचारले असता कापडीवास म्हणाले की, मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे; पण मला कोणत्या गोष्टीची किंमत चुकवावी लागत आहे ते माहीत नाही. या मतदारसंघात एका बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले तेव्हा समर्थकांनी मला आग्रह केला की, आपण निवडणूक लढायला पाहिजे. भाजपने विद्यमान ४८ आमदारांपैकी १२ जणांना उमेदवारी नाकारली आहे. भाजप आणि काँग्रेसशिवाय इंडियन नॅशनल लोकदल, शिरोमणी अकाली दल, जननायक जनता पाटी, बहुजन समाज पाटी, आम आदमी पाटी, स्वराज इंडिया निवडणूक मैदानात आहेत.अशोक तंवर यांचा राजीनामाकाँग्रेसच्या गोटातही अंतर्गत कलह आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अशोक तंवर यांनी हरयाणातील तिकीट वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तंवर यांनी शनिवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर तंवर यांना हटवून पक्षाने कुमारी शैलजा यांना पक्षाच्या राज्य शाखेचे प्रमुख बनविले होते.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविलेल्या राजीनाम्यात तंवर यांनी म्हटले आहे की, पक्षाला संपविण्याचा कट केला जात आहे. एका वृत्तसंस्थेला बोलताना ते म्हणाले की, आपल्यासमोर पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा