शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 05:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सार्वजनिक चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.

लखनौ : लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे. दरम्यान, भाजप आणि काँग्रेसमधील शब्दयुद्धही तीव्र होत चालले आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर वादविवादास तयार आहोत, असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी. लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती ए. पी. शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सार्वजनिक चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.

मी १०० टक्के तयार आहे, पण ‘ते’ आलेत का?nशुक्रवारी राजधानी लखनौमध्ये उपस्थित असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ‘मी पंतप्रधानांसह कोणाशीही कोणत्याही व्यासपीठावर वादविवादास १०० टक्के तयार आहे, पण मला माहीत आहे ते माझ्याशी वादविवाद करणार नाहीत. nआमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही अशाचप्रकारे वादविवाद करू शकतात,” असे स्पष्ट केले.

लिहून घ्या; भाजप निवडणूक हरणार राहुल गांधी आणि यादव यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ‘इंडिया’च्या प्रचारसभेला संबोधित केले. “तुम्ही माझ्याकडून लेखी घ्या, भाजप निवडणूक हरणार आहे,” असा विश्वास व्यक्त करीत राहुल यांनी भारत जोडो, न्याय यात्रा आणि विरोधी प्रचारसभांचा उल्लेख केला. इंडिया आघाडीने गेल्या काही वर्षांत आवश्यक निवडणूक तयारी केली आहे. द्वेषाच्या बाजारात प्रेमाची दुकानेही उघडली गेली, असे ते म्हणाले. 

राहुल गांधींनी चौकशीची मागणी करणे योग्यचदोन उद्योगपतींनी काँग्रेसला पैसे पाठवल्याच्या पंतप्रधानांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. या आरोपांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यांची चौकशी करण्याची मागणी करणे योग्यच आहे. - पी. चिदंबरम, नेते, काँग्रेस

राहुल गांधी, रेवंत रेड्डी यांचा शहर बसमधून प्रवासलोकसभा प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हैदराबाद शहरात शहर बसने एकत्र प्रवास करताना दिसले. त्यांच्यासोबत सामान्य लोकही प्रवास करताना दिसत होते. या प्रवासाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तत्पूर्वी या दोन्ही नेत्यांनी प्रचारसभेत संबोधित केले होते.

काँग्रेस हिंदुविरोधी पक्ष; जनतेला लुटणे हा त्यांचा इतिहास : माेदीहैदराबाद : काँग्रेस हिंदूविरोधी असून जनतेला लुटणे, काही जणांचे लांगुलचालन करणे, घराणेशाही जोपासणे हा त्या पक्षाचा इतिहास आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायद्याला काँग्रेस पक्ष विरोध करतो. व्होट जिहादची भाषा केली जाते. अशा प्रवृत्तींना जनतेने पराभूत करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४