शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अनेक महिने ठाण मांडण्यासाठी सज्ज, गावागावांतून मदतीचे हात पुढे; नाही धनधान्याची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 2:28 AM

स्थानिकांकडूनही रसद; पंजाबमधील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून दर एकरामागे १५० रुपये व प्रत्येक बिघामागे ४० रुपये आंदोलनासाठी निधी म्हणून गोळा करण्यात आले.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीनजीकच्या तिक्री सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी अनेक महिने आंदोलन करण्याच्या तयारीनेच तिथे आले आहेत. या आंदोलकांना धन, तसेच धान्याची कधीही कमतरता जाणवणार नाही अशी तेथील परिस्थिती आहे.  

आंदोलकांपैकी बहुतांश शेतकरी पंजाबमधील आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनासाठी या शेतकऱ्यांनी आपापल्या गावांतून निव्वळ मोठ्या प्रमाणावर निधीच नव्हे, तर अन्नधान्यासहित इतर वस्तूही गोळा केल्या आहेत. त्यामध्ये तांदूळ, साखर, पेट्रोल, डिझेल आदी गोष्टींचा समावेश आहे. या आंदोलकांना स्थानिक नागरिकांकडून भाजीपाला, फळे, दूध, पाणी, लाडू, हलवा, जिलेबी, लस्सी, मिठाई अशा अनेक गोष्टी पुरविण्यात येतात. त्याच गोष्टी सध्या आंदोलक वापरत असून, त्यांनी आपल्याकडील अन्नधान्य साठा पुढच्या काळासाठी जपून ठेवला आहे. हे आंदोलन लांबल्यास या गोष्टी कामाला येतील असा त्यामागे विचार आहे.

नव्या कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनासाठी हवा तितका निधी देण्याची तयारीही शेतकऱ्यांनी दाखविली आहे. त्यामुळे पैसा अपुरा पडण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही असेही हा आंदोलक म्हणाला.  

असा गोळा केला निधीपंजाबमधील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून दर एकरामागे १५० रुपये व प्रत्येक बिघामागे ४० रुपये आंदोलनासाठी निधी म्हणून गोळा करण्यात आले. या पैशातून आंदोलक शेतकऱ्यांनी ३ लाख रुपयांचे डिझेल विकत घेतले असल्याची माहिती एका आंदोलकाने दिली.

दीर्घ लढा : अल्प-भूधारकही रस्त्यावर 

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात बांधावरून रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी दीर्घ लढ्याची तयारी केली आहे. बळीराजाला मदतीसाठी असंख्य अदृश्य हात पुढे आले आहेत. त्यात स्थानिक लोक आहेत. पंजाबमधील शेतकरी या लढ्याचे केंद्र असून, तिकरी गावाच्या सीमेवर त्यांनी ठाण मांडले आहे.  शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारमध्येही अस्वस्थता आहे. कोरोना, रात्री उघड्यावर थंडीची पर्वा न करता शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. काही शेतकऱ्यांनी तर स्वतःकडे असलेल्या एकूण जमिनीचा एकरी भाव लावून आंदोलकांना मदत केली. दीडशे रुपये प्रतिएकर या पटीत शेतकरी मदत करीत आहेत. 

नोव्हेंबरपासून घर सोडल्याचे नमूद करून तेथील गुरलाल सिंह म्हणाले, आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्हाला लोकांनी मुक्तहस्ते मदत केली. गाव सोडताना आमच्याकडे तीन लाख रुपये गोळा झाले होते. एका जमीन मालकाने त्याच्याकडे असलेल्या जमिनीसाठी एकरामागे दीडशे रुपये मदत दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार हादरले आहे. दररोज  केंद्रीय प्रतिनिधी शेतकऱ्यांशी चर्चा करतात. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेतही चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप