शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

"अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत..."; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:40 IST

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला... पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला...

संविधान दिनानिमित्त लोकसभेतील चर्चेदरम्यान मुंगेरचे जेडीयू खासदार तथा केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ ​​ललन सिंह यांनी काँग्रेस पक्षावर जबरदस्त हल्ला चढवला. ललन सिंह म्हणाले, "आपल्या संविधान निर्मात्यांनी संविधान बनवले, तेव्हा त्यात दोन पैलूंसंदर्भात सांगण्यात आले आहे. संविधानातील एक पैलू, सर्व घटकांसाठी सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतो. तर दुसरीकडे, संविधानाशी छेडछाड करणाऱ्यांना कुठे जागा द्यायची, याचीही तरतूद त्यात आहे.

लालन सिंह पुढे म्हणाले, "या देशावर अनेक लोकांनी दीर्घकाळ राज्य केले आहे. नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात या देशात केलेली सर्व चांगली कामे राजनाथ सिंह यांनी सविस्तरपणे सांगितली आहेत. त्या कामांमध्ये एक मूलमंत्र आहे, जो याच संविधानातून निघाला आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास' हाच आपल्या संविधानाचा मूल मंत्र आहे. ही गोष्ट यांना (विरोधी पक्षांना) कुठे सजणार"

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला. यामुळे, आज संविधानाने त्यांना तेथे बसवले आहे, जेथे 15 वर्षांपसून फिरत आहेत. प्रियांका गांधी यांचे नाव न घेता लालन सिंह म्हणाले, काँग्रेसच्या महिला खासदाराने आपल्या पहिल्याच भाषणात सरकारवर आणि पंतप्रधानांवर अत्यंत व्यंगात्मक पद्धतीने निशाणा साधला. 'अरे आपल्याला माहीत नाही, जरा आपल्या पूर्वजांनी या देशावर जे शासन केले आहे त्यांचाही इतिहास वाचा. आपल्याकडे एक म्हण आहे, 'सौ चूहे खाकर, बिल्ली चली हज को'.

ललन सिंह पुढे म्हणाले, जे संविधानाचे भक्षक आहेत, ते आजकाल संविधानाची कॉपी घेऊन, अशा पद्धतीने फिरत आहेत, जसे काही संविधानाचे केवढे रक्षक आहेत. राहुल गांधींचे नाव न घेता, ललन सिंह म्हणाले, 'जे संविधानाचे भक्षक आहेत, ते संविधानाचे रक्षक कधीही होऊ शकत नाहीत. जेव्हा आपण संविधानाची प्रत घेऊन फिरता, तेव्हा जनता आपल्यावर हसते. किमान महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीतून तरी आपण धडा घ्यायला हवा होता. थोडे सुधरलात तर पुढे ठीक राहील.

लालन सिंह पुढे म्हणाले, "यांनी आपल्या सोयीसाठी घटनेत कलम 356 ची तरतूद केली. भीमराव आंबेडकरांनी कलम 356 च्या तरतुदीला राज्यघटनेचे मित्रपत्र म्हटले आहे. अर्थात ते केवळ विशेष परिस्थितीतच वापरले जायला हवे. मात्र, यांचा इतिहास आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला. राजीव गांधींच्या काळात 6 वेळा वापरले गेले. पीव्ही नरसिंह राव यांच्या काळात 11 वेळा आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळात 12 वेळा कलम 356 वापरण्यात आले. यांनी संविधानाच्या आत्म्याला कलंक लावण्याचे काम केले." 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधी