शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

"अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत..."; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:40 IST

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला... पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला...

संविधान दिनानिमित्त लोकसभेतील चर्चेदरम्यान मुंगेरचे जेडीयू खासदार तथा केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ ​​ललन सिंह यांनी काँग्रेस पक्षावर जबरदस्त हल्ला चढवला. ललन सिंह म्हणाले, "आपल्या संविधान निर्मात्यांनी संविधान बनवले, तेव्हा त्यात दोन पैलूंसंदर्भात सांगण्यात आले आहे. संविधानातील एक पैलू, सर्व घटकांसाठी सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतो. तर दुसरीकडे, संविधानाशी छेडछाड करणाऱ्यांना कुठे जागा द्यायची, याचीही तरतूद त्यात आहे.

लालन सिंह पुढे म्हणाले, "या देशावर अनेक लोकांनी दीर्घकाळ राज्य केले आहे. नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात या देशात केलेली सर्व चांगली कामे राजनाथ सिंह यांनी सविस्तरपणे सांगितली आहेत. त्या कामांमध्ये एक मूलमंत्र आहे, जो याच संविधानातून निघाला आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास' हाच आपल्या संविधानाचा मूल मंत्र आहे. ही गोष्ट यांना (विरोधी पक्षांना) कुठे सजणार"

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला. यामुळे, आज संविधानाने त्यांना तेथे बसवले आहे, जेथे 15 वर्षांपसून फिरत आहेत. प्रियांका गांधी यांचे नाव न घेता लालन सिंह म्हणाले, काँग्रेसच्या महिला खासदाराने आपल्या पहिल्याच भाषणात सरकारवर आणि पंतप्रधानांवर अत्यंत व्यंगात्मक पद्धतीने निशाणा साधला. 'अरे आपल्याला माहीत नाही, जरा आपल्या पूर्वजांनी या देशावर जे शासन केले आहे त्यांचाही इतिहास वाचा. आपल्याकडे एक म्हण आहे, 'सौ चूहे खाकर, बिल्ली चली हज को'.

ललन सिंह पुढे म्हणाले, जे संविधानाचे भक्षक आहेत, ते आजकाल संविधानाची कॉपी घेऊन, अशा पद्धतीने फिरत आहेत, जसे काही संविधानाचे केवढे रक्षक आहेत. राहुल गांधींचे नाव न घेता, ललन सिंह म्हणाले, 'जे संविधानाचे भक्षक आहेत, ते संविधानाचे रक्षक कधीही होऊ शकत नाहीत. जेव्हा आपण संविधानाची प्रत घेऊन फिरता, तेव्हा जनता आपल्यावर हसते. किमान महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीतून तरी आपण धडा घ्यायला हवा होता. थोडे सुधरलात तर पुढे ठीक राहील.

लालन सिंह पुढे म्हणाले, "यांनी आपल्या सोयीसाठी घटनेत कलम 356 ची तरतूद केली. भीमराव आंबेडकरांनी कलम 356 च्या तरतुदीला राज्यघटनेचे मित्रपत्र म्हटले आहे. अर्थात ते केवळ विशेष परिस्थितीतच वापरले जायला हवे. मात्र, यांचा इतिहास आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला. राजीव गांधींच्या काळात 6 वेळा वापरले गेले. पीव्ही नरसिंह राव यांच्या काळात 11 वेळा आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळात 12 वेळा कलम 356 वापरण्यात आले. यांनी संविधानाच्या आत्म्याला कलंक लावण्याचे काम केले." 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधी