शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत..."; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:40 IST

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला... पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला...

संविधान दिनानिमित्त लोकसभेतील चर्चेदरम्यान मुंगेरचे जेडीयू खासदार तथा केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ ​​ललन सिंह यांनी काँग्रेस पक्षावर जबरदस्त हल्ला चढवला. ललन सिंह म्हणाले, "आपल्या संविधान निर्मात्यांनी संविधान बनवले, तेव्हा त्यात दोन पैलूंसंदर्भात सांगण्यात आले आहे. संविधानातील एक पैलू, सर्व घटकांसाठी सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतो. तर दुसरीकडे, संविधानाशी छेडछाड करणाऱ्यांना कुठे जागा द्यायची, याचीही तरतूद त्यात आहे.

लालन सिंह पुढे म्हणाले, "या देशावर अनेक लोकांनी दीर्घकाळ राज्य केले आहे. नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात या देशात केलेली सर्व चांगली कामे राजनाथ सिंह यांनी सविस्तरपणे सांगितली आहेत. त्या कामांमध्ये एक मूलमंत्र आहे, जो याच संविधानातून निघाला आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास' हाच आपल्या संविधानाचा मूल मंत्र आहे. ही गोष्ट यांना (विरोधी पक्षांना) कुठे सजणार"

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला. यामुळे, आज संविधानाने त्यांना तेथे बसवले आहे, जेथे 15 वर्षांपसून फिरत आहेत. प्रियांका गांधी यांचे नाव न घेता लालन सिंह म्हणाले, काँग्रेसच्या महिला खासदाराने आपल्या पहिल्याच भाषणात सरकारवर आणि पंतप्रधानांवर अत्यंत व्यंगात्मक पद्धतीने निशाणा साधला. 'अरे आपल्याला माहीत नाही, जरा आपल्या पूर्वजांनी या देशावर जे शासन केले आहे त्यांचाही इतिहास वाचा. आपल्याकडे एक म्हण आहे, 'सौ चूहे खाकर, बिल्ली चली हज को'.

ललन सिंह पुढे म्हणाले, जे संविधानाचे भक्षक आहेत, ते आजकाल संविधानाची कॉपी घेऊन, अशा पद्धतीने फिरत आहेत, जसे काही संविधानाचे केवढे रक्षक आहेत. राहुल गांधींचे नाव न घेता, ललन सिंह म्हणाले, 'जे संविधानाचे भक्षक आहेत, ते संविधानाचे रक्षक कधीही होऊ शकत नाहीत. जेव्हा आपण संविधानाची प्रत घेऊन फिरता, तेव्हा जनता आपल्यावर हसते. किमान महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीतून तरी आपण धडा घ्यायला हवा होता. थोडे सुधरलात तर पुढे ठीक राहील.

लालन सिंह पुढे म्हणाले, "यांनी आपल्या सोयीसाठी घटनेत कलम 356 ची तरतूद केली. भीमराव आंबेडकरांनी कलम 356 च्या तरतुदीला राज्यघटनेचे मित्रपत्र म्हटले आहे. अर्थात ते केवळ विशेष परिस्थितीतच वापरले जायला हवे. मात्र, यांचा इतिहास आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला. राजीव गांधींच्या काळात 6 वेळा वापरले गेले. पीव्ही नरसिंह राव यांच्या काळात 11 वेळा आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळात 12 वेळा कलम 356 वापरण्यात आले. यांनी संविधानाच्या आत्म्याला कलंक लावण्याचे काम केले." 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधी