शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत..."; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:40 IST

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला... पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला...

संविधान दिनानिमित्त लोकसभेतील चर्चेदरम्यान मुंगेरचे जेडीयू खासदार तथा केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ ​​ललन सिंह यांनी काँग्रेस पक्षावर जबरदस्त हल्ला चढवला. ललन सिंह म्हणाले, "आपल्या संविधान निर्मात्यांनी संविधान बनवले, तेव्हा त्यात दोन पैलूंसंदर्भात सांगण्यात आले आहे. संविधानातील एक पैलू, सर्व घटकांसाठी सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतो. तर दुसरीकडे, संविधानाशी छेडछाड करणाऱ्यांना कुठे जागा द्यायची, याचीही तरतूद त्यात आहे.

लालन सिंह पुढे म्हणाले, "या देशावर अनेक लोकांनी दीर्घकाळ राज्य केले आहे. नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात या देशात केलेली सर्व चांगली कामे राजनाथ सिंह यांनी सविस्तरपणे सांगितली आहेत. त्या कामांमध्ये एक मूलमंत्र आहे, जो याच संविधानातून निघाला आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास' हाच आपल्या संविधानाचा मूल मंत्र आहे. ही गोष्ट यांना (विरोधी पक्षांना) कुठे सजणार"

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला. यामुळे, आज संविधानाने त्यांना तेथे बसवले आहे, जेथे 15 वर्षांपसून फिरत आहेत. प्रियांका गांधी यांचे नाव न घेता लालन सिंह म्हणाले, काँग्रेसच्या महिला खासदाराने आपल्या पहिल्याच भाषणात सरकारवर आणि पंतप्रधानांवर अत्यंत व्यंगात्मक पद्धतीने निशाणा साधला. 'अरे आपल्याला माहीत नाही, जरा आपल्या पूर्वजांनी या देशावर जे शासन केले आहे त्यांचाही इतिहास वाचा. आपल्याकडे एक म्हण आहे, 'सौ चूहे खाकर, बिल्ली चली हज को'.

ललन सिंह पुढे म्हणाले, जे संविधानाचे भक्षक आहेत, ते आजकाल संविधानाची कॉपी घेऊन, अशा पद्धतीने फिरत आहेत, जसे काही संविधानाचे केवढे रक्षक आहेत. राहुल गांधींचे नाव न घेता, ललन सिंह म्हणाले, 'जे संविधानाचे भक्षक आहेत, ते संविधानाचे रक्षक कधीही होऊ शकत नाहीत. जेव्हा आपण संविधानाची प्रत घेऊन फिरता, तेव्हा जनता आपल्यावर हसते. किमान महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीतून तरी आपण धडा घ्यायला हवा होता. थोडे सुधरलात तर पुढे ठीक राहील.

लालन सिंह पुढे म्हणाले, "यांनी आपल्या सोयीसाठी घटनेत कलम 356 ची तरतूद केली. भीमराव आंबेडकरांनी कलम 356 च्या तरतुदीला राज्यघटनेचे मित्रपत्र म्हटले आहे. अर्थात ते केवळ विशेष परिस्थितीतच वापरले जायला हवे. मात्र, यांचा इतिहास आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला. राजीव गांधींच्या काळात 6 वेळा वापरले गेले. पीव्ही नरसिंह राव यांच्या काळात 11 वेळा आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळात 12 वेळा कलम 356 वापरण्यात आले. यांनी संविधानाच्या आत्म्याला कलंक लावण्याचे काम केले." 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधी