शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायचीय? भगवद्गीता वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 11:42 IST

गीतेच्या अध्यायातून प्रश्न विचारले जाणार

जयपूर: कोणतीही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला, मुलाखत देणाऱ्या उमेदवाराला मोठ्या अपेक्षा असतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता परीक्षा, मुलाखत देणारे तसे कमीच. मात्र आता राजस्थान लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांना 'कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेऊ नका,' हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भगवदगीतेमधील प्रश्न विचारले जाणार आहेत.  राजस्थान लोकसेवा आयोगाने (आरपीएससी) 2018 च्या प्रशासकीय परीक्षेच्या अभ्यासक्रमात थोडा बदल केला आहे. त्यामुळे सामान्य ज्ञानाला नितीशास्त्राची जोड देण्यात आली आहे. यामध्ये भगवद्गीता आणि महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय नेते, समाज सुधारक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनाबद्दलच्या माहितीचाही समावेश आहे. राजस्थान प्रशासकीय सेवेच्या 2018 च्या बदलेल्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य ज्ञानाबद्दलचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. याशिवाय प्रशासन आणि व्यवस्थापनात भगवद्गीतेची भूमिका यासंदर्भातील प्रश्नदेखील विचारले जातील. या पेपरमध्ये एकूण 3 युनिट असतील. भगवद्गीतेमध्ये कुरुक्षेत्रावरील लढाईच्या दरम्यान भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेल्या संवादाचे 18 अध्याय आहेत. यामधूनच परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत.  विद्यार्थ्यांना प्रशासकीय आणि व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी भगवद्गीतेमधील प्रश्न विचारण्यात येणार असल्याचं राजस्थान लोकसेवा आयोगच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 'सर्व अध्याय लक्षात ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळू शकतात. त्यामुळे त्यांना अधिकारी झाल्यावर प्रशासकीय निर्णय घेताना मदत होईल,' अशी माहितीदेखील या अधिकाऱ्यानं दिली.  

टॅग्स :examपरीक्षाRajasthanराजस्थान