शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

RBI Governor Shaktikanta Das: 'इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत', RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 18:18 IST

RBI Governor Shaktikanta Das: 'कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा अनेक देशांवर वाईट परिणाम, पण भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नाही.'

RBI Governor Shaktikanta Das Latest News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. 'सध्या जागतिक अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे, पण भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत आहे,' असे वक्तव्य दास यांनी केले आहे. ते बँक ऑफ बडोदाच्या वार्षिक परिषदेत बोलत होते.

'भारतीय रुपया चांगल्या स्थितीत 'शक्तिकांत दास पुढे म्हणाले की, 'कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध हे जागतिक मंदीचे मुख्य कारण आहे. या दोन घटकांचा नकारात्मक परिणाम जवळपास सर्वच देशांवर दिसून आला आहे. पण भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा फारसा नकारात्मक परिणाम झालेला नाही. जगभरात चलनाच्या किमतींवरुन गोंधळाचे वातावरण आहे. पण, तुम्ही अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना केली, तर तुम्हाला भारतीय रुपया अजूनही चांगल्या स्थितीत दिसेल,' असेही ते म्हणाले.

'महागाईसाठी योग्य निर्णय घेतले जातील'दास पुढे म्हणतात की, 'युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि महामारीमुळे जागतिक मॅक्रो-इकॉनॉमिक दृष्टीकोन अनिश्चित झाला आहे. देशांना उच्च महागाई, अन्नधान्याची कमतरता, मागणी आणि पुरवठेतील बिघडलेला ताळमेळ, यांचा सामना करावा लागत आहे. चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी 2016 मध्ये स्वीकारलेल्या सध्याच्या धोरणाने चांगले परिणाम दिले आहेत. गेल्या वर्षांतील चलनवाढीची पातळी आरबीआयच्या लक्ष्याशी सुसंगत होती,' असेही दास म्हणाले.

टॅग्स :Shaktikanta Dasशक्तिकांत दासReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकInflationमहागाईEconomyअर्थव्यवस्था