शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

भारतीय सैन्यातून निवृत्त होताच मुलीसोबत दिली परीक्षा; बाप अन् लेक एकाचवेळी झाले अकाउंटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 18:01 IST

सुलतानपूर येथील बाप-लेकीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील बाप-लेकीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या वडिलांनी निवृत्तीनंतर लेकीसोबत अभ्यास केला अन् अकाउंटंट होण्याचा मान पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे संबंधित वडील आणि त्यांची मुलगी दोघेही एकाचवेळी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. या बाप-लेकीच्या जोडीची सर्वत्र चर्चा रंगली असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. 

सुलतानपूर येथील बल्दीराय परिसरातील तिवारी गावातील रवींद्र त्रिपाठी हे २०१९ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. देशसेवा केल्यानंतर ते इथेच थांबले नाहीत. निवृत्तीनंतर त्यांनी मुलगी प्रिया त्रिपाठीसोबत बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करायला सुरूवात केली. देशसेवा केल्यानंतर आता समाजसेवेचीही संधी मिळाली असल्याचे रवींद्र त्रिपाठी सांगतात. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वयाच्या १९ व्या वर्षी रवींद्र त्रिपाठी हे ५ मार्च १९९१ रोजी सैन्यात भरती झाले होते.  

२८ वर्ष देशसेवा अन् आता नवा अध्याय दरम्यान, भारतीय लष्करात २८ वर्षांच्या सेवेनंतर पाच वर्षांपूर्वी सुभेदार पदावरून निवृत्त झालेले रवींद्र गावाकडे परतले नाहीत. त्यांनी मुलगी प्रिया त्रिपाठी आणि मुलगा दीपेंद्र त्रिपाठी यांच्यासह लखनौमध्ये राहणे पसंत केले आणि बँकिंग क्षेत्रात नशीब आजमवण्याचे ठरवले. यावेळी त्यांनी आपल्या मुलीसह एसबीआय पीओची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली परंतु मेन्समध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांची उत्तर प्रदेश पोलिसात उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. पीटीएस मुरादाबादमधील प्रशिक्षणासाठी नियुक्ती पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्राप्त झाले होते. मात्र, ते कुटुंबासोबत राहत असल्यामुळे तिथे रुजू झाले नाहीत. याच कालावधीत त्यांचा मुलगा दीपेंद्रची पोस्ट ऑफिसमध्ये निवड झाली. शनिवारी परीक्षेच्या निकालात रवींद्र यांच्या नावासह त्यांच्या मुलीच्या नावाची नोंद होती. त्यामुळे आता ते आपल्या मुलीसोबत अकाउंटंट म्हणूनही काम करणार आहे.

"तरूणांनी मोबाईल सोडून पुस्तकाशी मैत्री करावी"समाजासमोर एक आदर्श ठेवल्यानंतर रवींद्र त्रिपाठी प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी तरूणांना सल्ला दिला की, मी आधी देशाची सेवा केली, आता समाजाची सेवा करणार आहे. समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो. त्यामुळे मी सांगेन की, तरुणांनी मोबाईलऐवजी पुस्तकांशी मैत्री करावी. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndian Armyभारतीय जवानInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी