शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

भारतीय सैन्यातून निवृत्त होताच मुलीसोबत दिली परीक्षा; बाप अन् लेक एकाचवेळी झाले अकाउंटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 18:01 IST

सुलतानपूर येथील बाप-लेकीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील बाप-लेकीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या वडिलांनी निवृत्तीनंतर लेकीसोबत अभ्यास केला अन् अकाउंटंट होण्याचा मान पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे संबंधित वडील आणि त्यांची मुलगी दोघेही एकाचवेळी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. या बाप-लेकीच्या जोडीची सर्वत्र चर्चा रंगली असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. 

सुलतानपूर येथील बल्दीराय परिसरातील तिवारी गावातील रवींद्र त्रिपाठी हे २०१९ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. देशसेवा केल्यानंतर ते इथेच थांबले नाहीत. निवृत्तीनंतर त्यांनी मुलगी प्रिया त्रिपाठीसोबत बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करायला सुरूवात केली. देशसेवा केल्यानंतर आता समाजसेवेचीही संधी मिळाली असल्याचे रवींद्र त्रिपाठी सांगतात. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वयाच्या १९ व्या वर्षी रवींद्र त्रिपाठी हे ५ मार्च १९९१ रोजी सैन्यात भरती झाले होते.  

२८ वर्ष देशसेवा अन् आता नवा अध्याय दरम्यान, भारतीय लष्करात २८ वर्षांच्या सेवेनंतर पाच वर्षांपूर्वी सुभेदार पदावरून निवृत्त झालेले रवींद्र गावाकडे परतले नाहीत. त्यांनी मुलगी प्रिया त्रिपाठी आणि मुलगा दीपेंद्र त्रिपाठी यांच्यासह लखनौमध्ये राहणे पसंत केले आणि बँकिंग क्षेत्रात नशीब आजमवण्याचे ठरवले. यावेळी त्यांनी आपल्या मुलीसह एसबीआय पीओची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली परंतु मेन्समध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांची उत्तर प्रदेश पोलिसात उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. पीटीएस मुरादाबादमधील प्रशिक्षणासाठी नियुक्ती पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्राप्त झाले होते. मात्र, ते कुटुंबासोबत राहत असल्यामुळे तिथे रुजू झाले नाहीत. याच कालावधीत त्यांचा मुलगा दीपेंद्रची पोस्ट ऑफिसमध्ये निवड झाली. शनिवारी परीक्षेच्या निकालात रवींद्र यांच्या नावासह त्यांच्या मुलीच्या नावाची नोंद होती. त्यामुळे आता ते आपल्या मुलीसोबत अकाउंटंट म्हणूनही काम करणार आहे.

"तरूणांनी मोबाईल सोडून पुस्तकाशी मैत्री करावी"समाजासमोर एक आदर्श ठेवल्यानंतर रवींद्र त्रिपाठी प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी तरूणांना सल्ला दिला की, मी आधी देशाची सेवा केली, आता समाजाची सेवा करणार आहे. समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो. त्यामुळे मी सांगेन की, तरुणांनी मोबाईलऐवजी पुस्तकांशी मैत्री करावी. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndian Armyभारतीय जवानInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी