शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला बुडवूनही राहुल गांधी सुधारले नाहीत : रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 17:34 IST

राहुल यांनी जनतेच्या भावनेचा तरी आदर करावा. १५ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ज्यांनी मते दिले नाहीत, त्यांच्यासाठी देखील भाजप काम करणार आहे, असही प्रसाद म्हणाले.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी सुधारले नसल्याची टीका प्रसाद यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तरी देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात सुधारणा झाली नसल्याचे प्रसाद म्हणाले. राहुल सध्या वायनाड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मोदींवर निशाना साधला. मी कठोर शब्दांचा वापर करतो, परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी राग आणि द्वेष निर्माण करून देशातील नागरिकांना विभागण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राहुल यांनी म्हटले होते.

काँग्रेस पक्ष म्हणजे बंधुभाव आणि सत्याचं रूप आहे. मात्र नरेंद्र मोदी खोटं आणि द्वेषाच्या जोरावर देशावर राज्य करत आहेत. भाजपच्या खोटेपणाविरुद्ध काँग्रेसची लढाई सुरूच राहिल, असंही राहुल म्हणाले. त्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या टीकेचा समाचार घेतला. तसेच पराभवानंतर तरी सुधारणा करा, असा टोला लगावला. तसेच राहुल यांनी जनतेच्या भावनेचा तरी आदर करावा. १५ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ज्यांनी मते दिले नाहीत, त्यांच्यासाठी देखील भाजप काम करणार आहे. जनतेला मोदींवर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले. यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी यावेळी राममंदिरा संदर्भातील शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन केले.