शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

काँग्रेसला बुडवूनही राहुल गांधी सुधारले नाहीत : रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 17:34 IST

राहुल यांनी जनतेच्या भावनेचा तरी आदर करावा. १५ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ज्यांनी मते दिले नाहीत, त्यांच्यासाठी देखील भाजप काम करणार आहे, असही प्रसाद म्हणाले.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी सुधारले नसल्याची टीका प्रसाद यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तरी देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात सुधारणा झाली नसल्याचे प्रसाद म्हणाले. राहुल सध्या वायनाड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मोदींवर निशाना साधला. मी कठोर शब्दांचा वापर करतो, परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी राग आणि द्वेष निर्माण करून देशातील नागरिकांना विभागण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राहुल यांनी म्हटले होते.

काँग्रेस पक्ष म्हणजे बंधुभाव आणि सत्याचं रूप आहे. मात्र नरेंद्र मोदी खोटं आणि द्वेषाच्या जोरावर देशावर राज्य करत आहेत. भाजपच्या खोटेपणाविरुद्ध काँग्रेसची लढाई सुरूच राहिल, असंही राहुल म्हणाले. त्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या टीकेचा समाचार घेतला. तसेच पराभवानंतर तरी सुधारणा करा, असा टोला लगावला. तसेच राहुल यांनी जनतेच्या भावनेचा तरी आदर करावा. १५ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ज्यांनी मते दिले नाहीत, त्यांच्यासाठी देखील भाजप काम करणार आहे. जनतेला मोदींवर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले. यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी यावेळी राममंदिरा संदर्भातील शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन केले.