समतेसाठी प्रबोधन शिबिराची गरज रत्नाकर गायकवाड: बहुजन रयत परिषद कार्यकर्ता प्रबोधन शिबीर
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:01+5:302016-01-03T00:05:01+5:30
सोलापूर: समाजाचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो त्याचे स्वरुप गौतम बुद्धांनी तयार केले. विचारविनिमय करुन तो विचार अंमलात आणला तर बाबासाहेबांना समजून घेतले तर सामाजिक समता निर्माण होईल. रोज मुलांना अन्नपाणी मिळाल्यानंतर अभ्यास व स्मरणशक्ती वाढते. त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. समतेसाठी अशा प्रबोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड केले.

समतेसाठी प्रबोधन शिबिराची गरज रत्नाकर गायकवाड: बहुजन रयत परिषद कार्यकर्ता प्रबोधन शिबीर
स लापूर: समाजाचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो त्याचे स्वरुप गौतम बुद्धांनी तयार केले. विचारविनिमय करुन तो विचार अंमलात आणला तर बाबासाहेबांना समजून घेतले तर सामाजिक समता निर्माण होईल. रोज मुलांना अन्नपाणी मिळाल्यानंतर अभ्यास व स्मरणशक्ती वाढते. त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. समतेसाठी अशा प्रबोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड केले. बहुजन रयत परिषदेच्या वतीने सोनिया अध्यापक विद्यालयात आयोजित कार्यकर्ता प्रबोधन शिबिरामध्ये दलित चळवळीने गेल्या तीन दशकात काय साधले? या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, ल. सि. जाधव, अब्राहम आवळे, प्राचार्य सीताराम गोसावी, पत्रकार र्शीकांत साबळे यांच्या हस्ते ‘संगच्छधम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ल. सि. जाधव म्हणाले, ऋग्वेदातील मंत्रांचा आधार आणि बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या महान कार्याला ही कादंबरी अर्पित आहे. संगच्छधम’ याचा अर्थ म्हणजे आपण सगळे मिळून जाऊ एकमेकांना समजून घेऊ, आपण सगळे काम करु असा होतो. या शिबिराच्या निमित्ताने या मंत्रानुसार आचरण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘प्रश्न तुमचे उत्तर आमचे’ या उपक्रमात सयाजी गायकवाड (कोल्हापूर), दादासाहेब तांदळे (पन्हाळा), अनिल बावीसकर, अशोकराव लोखंडे, नारायण कारंजकर, रघुवीर शिराळकर, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी सहभाग नोंदवला. मान्यवरांनी यावेळी कार्यकर्त्यांनी आपला उत्साह कायम ठेवून समाजोन्नतीसाठी प्रय} करावेत. शिक्षण महत्त्वाचे आहे. चळवळ जिवंत राहिली पाहिजे. कार्यकर्ता घडला पाहिजे. बहुजन रयत परिषदेने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. दुसर्या सत्रात प्राचार्य सीताराम गोसावी यांनी आपल्या भाषणातून आपापल्या परिसरात कार्यकर्ता दडला आाहे. या शिबिरामुळे वैचारिक बैठकीची पोकळी भरुन निघणार आहे. असे उपक्रम सातत्याने घडायला पाहिजेत. बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. अन्यथा होतोय असं बोलण्याची सोयदेखील राहिली नाही. सांस्कृतिक दहशतवादाची स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक ठिकाणी बोलण्याची र्मयादा पडलेली दिसते. वंचित वर्गाचा विचार करुन त्यांना प्रवाहात घेण्याची गरज आहे. मुस्लीम,आदिवासी स्त्रीची यात मोठी गळचेपी होतेय. चळवळ दोन पद्धतीने चालते. एक आंदोलनाच्या माध्यमातून दोन रचनात्मक कार्याच्या माध्यमातून. सांस्कृतिक कोंडीला समजून घेण्याची गरज आहे.तिसर्या सत्रात म. रा. अ. ज. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी.एस. थूल यांनी न्यायव्यवस्था गतिमान कशी होईल या विषयावरील परिसंवादातून परखड मते मांडली. प्रस्थापितांना शह देण्याची मशाल शाहू, फुले, आंबेडकर यांनी दिली आहे. संविधानाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय मिळाला. समाजाचा सर्वांगीण विकास हेच संविधान शिकवते, असे त्यांनी स्पष्ट केले.