शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

रासुका : याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 05:11 IST

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात होत असलेल्या निदर्शनादरम्यान काही राज्ये आणि दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू करण्याबाबत आव्हान देणाऱ्या याचिकांवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात होत असलेल्या निदर्शनादरम्यान काही राज्ये आणि दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू करण्याबाबत आव्हान देणाऱ्या याचिकांवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. न्या. अरुण मिश्रा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या पीठाने म्हटले आहे की, रासुका लावण्याबाबत कोणताही व्यापक आदेश दिला जाऊ शकत नाही.न्यायालयाने अ‍ॅड. मनोहरलाल शर्मा यांना सांगितले की, ते याप्रकरणी आपली याचिका परत घेऊ शकतात. शर्मा यांनी या याचिकेत रासुका लावण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत म्हटले होते की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरला विरोध करणाºया लोकांवर दबाव टाकण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी १० जानेवारी रोजी रासुकाचा कालावधी १९ जानेवारीपर्यंत तीन महिन्यांसाठी वाढविला होता. या कायद्यानुसार, पोलिसांना कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. पोलीस कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय १२ महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवू शकतात.द्रमुकचे स्वाक्षरी अभियानतामिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वातील विरोधी पक्षाने सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात व्यापक स्वाक्षरी मोहीम चालविण्याचा संकल्प शुक्रवारी केला. द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन म्हणाले की, सीएए परत घ्यायला हवा आणि तामिळनाडूत राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरची (एनपीआर) तयारी व्हायला नको. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्टॅलिन म्हणाले की, आम्ही याबाबत २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या काळात व्यापक स्वाक्षरी मोहीम चालविणार आहोत.रस्त्यांवर उतरणारे हिंमत देत आहेत : नंदिता दाससीएए आणि एनआरसीविरोधात रस्त्यांवर उतरणारे विद्यार्थी, महिला हे आंदोलक आम्हाला विभाजनकारी कायद्याविरोधात बोलण्याची हिंमत देत आहेत, असे मत अभिनेत्री, दिग्दर्शक नंदिता दास यांनी व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, हे आंदोलक केवळ विरोध प्रदर्शनाचा विस्तार म्हणून रस्त्यांवर उतरत नाहीत, तर स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला जागून आंदोलनात उतरत आहेत. अशा आंदोलनातून एक संदेश जातो की, आम्ही एकटे नाहीत.‘हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी’माजी न्यायाधीश, माजी अधिकारी आणि माजी सैन्य अधिकारी यांच्यासह १५४ प्रतिष्ठित नागरिकांनी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आग्रह केला की, लोकशाहीतील संस्थांचे संरक्षण व्हावे आणि सीएएविरोधाच्या नावाखाली हिंसाचार करणाºयांवर कारवाई व्हावी. माजी न्यायाधीश प्रमोद कोहली यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेऊन ही विनंती केली. त्यांनी असाही दावा केला की, आंदोलन काही राजकीय पक्षांनी भडकविले.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय