शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ईशान्येत सत्तेसाठी रस्सीखेच : दोन राज्यांत ‘मित्र’ सरकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 06:42 IST

त्रिपुरात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर, नेता निवडीसाठी मंगळवारी भाजपा व आयपीएफटीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बिप्लब देब यांनी दिली.

त्रिपुरा : भाजपाच्या नेता निवडीसाठी मंगळवारी बैठक; बिप्लव देव हेच प्रबळ दावेदारआगरतळा : त्रिपुरात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर, नेता निवडीसाठी मंगळवारी भाजपा व आयपीएफटीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बिप्लब देब यांनी दिली. तथापि, भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्युएल ओराम यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बिप्लव देव हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. नव्या सरकारचा शपथविधी ८ मार्च रोजी होईल, अशी शक्यता आहे.भाजपाचे ३५ आमदार निवडून आले असून, सहकारी पक्ष आयपीएफटीचे ८ सदस्य निवडून आले आहेत. दरम्यान, मंगळवारी होणाºया बैठकीला नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल, असे देब यांनी सांगितले.माणिक सरकार यांचा राजीनामात्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी रविवारी राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे राजीनामा सोपविला. विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारीचजाहीर झाले. भाजपाने डाव्या पक्षांची २५ वर्षांची सत्ता उलथून लावत येथे बहुमत मिळविले आहे. तथापि, नवे मुख्यमंत्री सत्तारूढ होईपर्यंतत्यांना काम पाहण्यास सांगितले आहे.मेघालय : भाजपाचा मित्रपक्ष एनपीपीच्या संगमा यांनी केला सरकार स्थापनेचा दावागंगटोक : ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ (एनपीपी) या भाजपाच्या मित्रपक्षाचे नेते कॉन्राड संगमा यांनी मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची रविवारी भेट घेऊन ३४ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला.या आधी मेघालय विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर, मुकुल संगमा यांनीही राज्यपालांना भेटून सर्वात मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापनेसाठी आपल्याला आधी संधी द्यावी, अशी विनंती केली. ५९ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे २१ तर ‘एनपीपी’चे १९ सदस्य निवडून आले आहेत.काँग्रेस वगळून अन्य सर्व पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा दावा कॉन्राड संगमा यांनी केला.आज चित्रस्पष्ट होईलराज्यपालांनीअद्याप कोणालाही सरकार स्थापनेसाठी पाचारण केलेनसले, तरी उद्या सोमवारपर्यंतचित्र स्पष्ट होईलव नव्या सरकारचा शपथविधी मंगळवारी ६मार्च रोजी होईल, असे समजते.नागालँड : एनडीपीपीचे रियो यांचा सत्ता स्थापन्याचा दावा, भाजपासह अन्य पक्ष सोबतकोहिमा : नागालँडमध्ये आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगे्रसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेफ्यू रियो यांनी केला आहे. रियो यांच्याकडे बहुमत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे, असे राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी म्हटले असले, तरी रियो यांनी सोमवारपर्यंत ३२ आमदारांच्या समर्थनाचे पत्र स्वाक्षºयांसह सादर करावे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि महासचिव अरुण सिंह हे नागालँडमध्ये पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आहेत. जेडीयूचे एकमेव आमदार जी. कैटो अये आणि अपक्ष आमदार टोंगपांग ओजुकुम यांनी रियो यांच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती एनडीपीपीचे महासचिव अबू मेथा यांनी दिली.कोहिमा : नागालँडमध्ये आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगे्रसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेफ्यू रियो यांनी केला आहे. रियो यांच्याकडे बहुमत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे, असे राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी म्हटले असले, तरी रियो यांनी सोमवारपर्यंत ३२ आमदारांच्या समर्थनाचे पत्र स्वाक्षºयांसह सादर करावे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि महासचिव अरुण सिंह हे नागालँडमध्ये पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आहेत. जेडीयूचे एकमेव आमदार जी. कैटो अये आणि अपक्ष आमदार टोंगपांग ओजुकुम यांनी रियो यांच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती एनडीपीपीचे महासचिव अबू मेथा यांनी दिली.राज्यपालांची घेतली भेटनेफ्यू रियो यांनीरविवारी राज्यपालपी. बी. आचार्य यांचीभेट घेतली आणि आपल्याकडे बहुमत आहे, असा दावा केला. रिओ हे राज्यात ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नागालँडमधील ६० सदस्यीय विधानसभेत रियो यांच्या एनडीपीपीला १८, तर सहकारी पक्ष भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNagaland Election Results 2018नागालँड निवडणूक निकाल 2018