शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानासाठी सरकारच्या तिजोरीत खडखडाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 19:04 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गतचे उद्दिष्ट पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचा सरकारनं ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. 

नवी दिल्ली, दि. 17 -  महात्मा गांधींच्या 150 व्या जन्म शताब्दीनिमित्त स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल असे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजपथ, नवी दिल्ली येथे 02 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करताना म्हटले. त्यानंतर स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी एका चळवळीचे स्वरुप देण्यात आले. पण आज या योजनेवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारने सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना पत्र लिहून त्यांच्या सोशल रिस्पॉन्सिबिलीटी फंड अर्थात सीएसआरमधून 7 टक्के भाग स्वच्छ भारत अभियानासाठी देण्याची विनंती सरकारने केली आहे.

2019 पर्यंत देशात 11 कोटी शौचालय बनवण्याचं सरकारनं उद्दिष्ट ठेवलय, मात्र प्रत्यक्षात 2015 पर्यंत केवळ 49 लाख शौचालये बनवली. 2016-17 या वर्षात हा वेग आणखी मंदावला.  त्यामुळे या अभियानाला गती देण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू केलेत. या अभियानांतर्गतचे उद्दिष्ट पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचा सरकारनं ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. 

म्हणून कॉर्पोरेट कंपन्यांना स्वच्छ भारताचं महत्त्व पटवून देत त्यांनीही या अभियानात आपलं योगदान देण्याचं आवाहनही सरकारमार्फत पत्रातून करण्यात आलं आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वच्छता राखण्याचे संदेश देणारे होर्डिंग्ज लावावेत, गावं दत्तक घ्यावी, सफाईकर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी हातभार लावावा, शौचालयांच्या देखभालीची जबाबदारी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे. अर्थात कंपन्यांवर कोणतीही बळजबरी करण्यात आली नसून त्यांनी स्वेच्छेने आपलं योगदान स्वच्छ भारतासाठी द्यावयाचं असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

स्वच्छ भारत अभियानासाठी अर्धा टक्का करस्वच्छ भारत अभियानासाठी 15 नोव्हेंबर 2016 पासून देशभरात सर्व सेवांवर अर्धा टक्का स्वच्छता सेस(कर) लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे एकूण कर 14.5 टक्के होणार आहे. देशातील प्रत्येक नागरीकांकडून स्वच्छता करामध्ये जमा होणारी रक्कम स्वच्छ भारत अभियानासाठी वापरण्यात येणार आहे. 100 रुपयाच्या सेवावर 50 पैसे कर आकारण्यात येतोय.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGovernmentसरकार