शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

दिल्लीत दुर्मीळ कल्पवृक्ष

By admin | Updated: March 23, 2017 00:55 IST

कल्पवृक्षाचे आपण केवळ नाव ऐकून आहोत, परंतु दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात गेलात तर तुम्हाला हा वृक्ष पाहताही येईल.

नवी दिल्ली : कल्पवृक्षाचे आपण केवळ नाव ऐकून आहोत, परंतु दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात गेलात तर तुम्हाला हा वृक्ष पाहताही येईल. अनोख्या औषधीय गुणांमुळे या वृक्षाचे सर्वांनाच आकर्षण आहे. तथापि, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने त्याची ओळख लपविली आहे. लोकांनी या झाडाचे नुकसान करू नये, म्हणून असे करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्राचीन वृक्षाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची लोकांचीही जबाबदारी आहे. दिल्लीत तीन कल्पवृक्ष असून, त्यातील दोन प्राणिसंग्रहालयात आहेत. २००८ मधील एका सर्व्हेत त्यांचा छडा लागला होता. त्यानंतर, सर्व्हेवर आधारित पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला होता. तेव्हा येथे तीन कल्पवृक्ष होते. मात्र, त्यातील एक वाळला आहे. सर्व्हेनंतर या झाडांवर नावाची पाटी लावण्यात आली होती. मात्र, नंतर ती काढून टाकण्यात आली. ही झाडे कल्पवृक्ष असल्याचे कळताच लोकांनी त्यांची साल काढणे, पाने, फुले आणि फांद्या तोडणे सुरू केले. हे कमी म्हणून की काय, पूजापाठही सुरू झाले. झाडाचे नुकसान होत असल्याचे पाहून प्रशासनाने नावाची पाटी हटवून झाडाभोवती तारेचे कुंपण केले. लोकांनी झाडांचे नुकसान करू नये, म्हणून केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ झाल्यानंतर तारेचे कुंपण करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. या कल्पवृक्षापैकी एक वृक्ष गोरिलाच्या पिंजऱ्याजवळ असून, त्याला तारेचे कुंपण आहे. दुसरा कल्पवृक्ष जिराफाच्या पिंजऱ्यात असल्यामुळे काहीसा सुरक्षित आहे. येथून दररोज शेकडो लोक जातात, परंतु कोणाचेही आता या वृक्षांकडे लक्ष जात नाही. हिंदू संस्कृतीनुसार, कल्पवृक्ष समुद्रमंथनातून उत्पन्न झाला होता. हा पृथ्वीवर सर्वात जास्त वर्षे जगणाऱ्या वृक्षांपैकी एक आहे. याला बओबाब किंवा मंकी ब्रेड वृक्ष असेही म्हटले जाते. आफ्रिकेत हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, भारतात त्यांची संख्या खूप कमी आहे. दिल्लीशिवाय कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत ते तुरळक प्रमाणात आढळतात. तथापि, त्यांच्या लुप्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत.