शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

दिल्लीत दुर्मीळ कल्पवृक्ष

By admin | Updated: March 23, 2017 00:55 IST

कल्पवृक्षाचे आपण केवळ नाव ऐकून आहोत, परंतु दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात गेलात तर तुम्हाला हा वृक्ष पाहताही येईल.

नवी दिल्ली : कल्पवृक्षाचे आपण केवळ नाव ऐकून आहोत, परंतु दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात गेलात तर तुम्हाला हा वृक्ष पाहताही येईल. अनोख्या औषधीय गुणांमुळे या वृक्षाचे सर्वांनाच आकर्षण आहे. तथापि, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने त्याची ओळख लपविली आहे. लोकांनी या झाडाचे नुकसान करू नये, म्हणून असे करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्राचीन वृक्षाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची लोकांचीही जबाबदारी आहे. दिल्लीत तीन कल्पवृक्ष असून, त्यातील दोन प्राणिसंग्रहालयात आहेत. २००८ मधील एका सर्व्हेत त्यांचा छडा लागला होता. त्यानंतर, सर्व्हेवर आधारित पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला होता. तेव्हा येथे तीन कल्पवृक्ष होते. मात्र, त्यातील एक वाळला आहे. सर्व्हेनंतर या झाडांवर नावाची पाटी लावण्यात आली होती. मात्र, नंतर ती काढून टाकण्यात आली. ही झाडे कल्पवृक्ष असल्याचे कळताच लोकांनी त्यांची साल काढणे, पाने, फुले आणि फांद्या तोडणे सुरू केले. हे कमी म्हणून की काय, पूजापाठही सुरू झाले. झाडाचे नुकसान होत असल्याचे पाहून प्रशासनाने नावाची पाटी हटवून झाडाभोवती तारेचे कुंपण केले. लोकांनी झाडांचे नुकसान करू नये, म्हणून केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ झाल्यानंतर तारेचे कुंपण करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. या कल्पवृक्षापैकी एक वृक्ष गोरिलाच्या पिंजऱ्याजवळ असून, त्याला तारेचे कुंपण आहे. दुसरा कल्पवृक्ष जिराफाच्या पिंजऱ्यात असल्यामुळे काहीसा सुरक्षित आहे. येथून दररोज शेकडो लोक जातात, परंतु कोणाचेही आता या वृक्षांकडे लक्ष जात नाही. हिंदू संस्कृतीनुसार, कल्पवृक्ष समुद्रमंथनातून उत्पन्न झाला होता. हा पृथ्वीवर सर्वात जास्त वर्षे जगणाऱ्या वृक्षांपैकी एक आहे. याला बओबाब किंवा मंकी ब्रेड वृक्ष असेही म्हटले जाते. आफ्रिकेत हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, भारतात त्यांची संख्या खूप कमी आहे. दिल्लीशिवाय कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत ते तुरळक प्रमाणात आढळतात. तथापि, त्यांच्या लुप्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत.