शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

दिल्लीत दुर्मीळ कल्पवृक्ष

By admin | Updated: March 23, 2017 00:55 IST

कल्पवृक्षाचे आपण केवळ नाव ऐकून आहोत, परंतु दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात गेलात तर तुम्हाला हा वृक्ष पाहताही येईल.

नवी दिल्ली : कल्पवृक्षाचे आपण केवळ नाव ऐकून आहोत, परंतु दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात गेलात तर तुम्हाला हा वृक्ष पाहताही येईल. अनोख्या औषधीय गुणांमुळे या वृक्षाचे सर्वांनाच आकर्षण आहे. तथापि, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने त्याची ओळख लपविली आहे. लोकांनी या झाडाचे नुकसान करू नये, म्हणून असे करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्राचीन वृक्षाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची लोकांचीही जबाबदारी आहे. दिल्लीत तीन कल्पवृक्ष असून, त्यातील दोन प्राणिसंग्रहालयात आहेत. २००८ मधील एका सर्व्हेत त्यांचा छडा लागला होता. त्यानंतर, सर्व्हेवर आधारित पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला होता. तेव्हा येथे तीन कल्पवृक्ष होते. मात्र, त्यातील एक वाळला आहे. सर्व्हेनंतर या झाडांवर नावाची पाटी लावण्यात आली होती. मात्र, नंतर ती काढून टाकण्यात आली. ही झाडे कल्पवृक्ष असल्याचे कळताच लोकांनी त्यांची साल काढणे, पाने, फुले आणि फांद्या तोडणे सुरू केले. हे कमी म्हणून की काय, पूजापाठही सुरू झाले. झाडाचे नुकसान होत असल्याचे पाहून प्रशासनाने नावाची पाटी हटवून झाडाभोवती तारेचे कुंपण केले. लोकांनी झाडांचे नुकसान करू नये, म्हणून केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ झाल्यानंतर तारेचे कुंपण करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. या कल्पवृक्षापैकी एक वृक्ष गोरिलाच्या पिंजऱ्याजवळ असून, त्याला तारेचे कुंपण आहे. दुसरा कल्पवृक्ष जिराफाच्या पिंजऱ्यात असल्यामुळे काहीसा सुरक्षित आहे. येथून दररोज शेकडो लोक जातात, परंतु कोणाचेही आता या वृक्षांकडे लक्ष जात नाही. हिंदू संस्कृतीनुसार, कल्पवृक्ष समुद्रमंथनातून उत्पन्न झाला होता. हा पृथ्वीवर सर्वात जास्त वर्षे जगणाऱ्या वृक्षांपैकी एक आहे. याला बओबाब किंवा मंकी ब्रेड वृक्ष असेही म्हटले जाते. आफ्रिकेत हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, भारतात त्यांची संख्या खूप कमी आहे. दिल्लीशिवाय कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत ते तुरळक प्रमाणात आढळतात. तथापि, त्यांच्या लुप्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत.