रायते यांची उचलबांगडी अटळ?
By Admin | Updated: November 22, 2015 23:15 IST2015-11-22T23:15:51+5:302015-11-22T23:15:51+5:30
जळगाव: रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवर्यात अडकलेले स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांची उचलबांगडी अटळ मानली जात आहे. उच्चपदस्थ अधिकार्यानेही नाव न सांगण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, रायतेंच्या जागी आपलीच वर्णी लागावी यासाठी चार जणांनी मंत्र्यांकडे फिल्डींग लावली आहे.

रायते यांची उचलबांगडी अटळ?
ज गाव: रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवर्यात अडकलेले स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांची उचलबांगडी अटळ मानली जात आहे. उच्चपदस्थ अधिकार्यानेही नाव न सांगण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, रायतेंच्या जागी आपलीच वर्णी लागावी यासाठी चार जणांनी मंत्र्यांकडे फिल्डींग लावली आहे.सादरे यांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वाळूमाफिया सागर चौधरीसह पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व रायते यांचा उल्लेख केला आहे. त्यांच्यापासून होणारा छळ अस झाल्यानेच सादरेंनी टोकाचे पाऊल उचलले असा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांच्या अहवालात गंभीर ठपकेनाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी केलेल्या तपासात रायते यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे ठपके ठेवण्यात आले आहेत. पुढे हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे वर्ग झाल्याने तो चौकशी अहवाल सीआयडीने जसाचा तसा मान्य केला आहे. त्यातील काही त्रुटी व नव्याने आखणी झालेल्या मुद्यावर आता तपासाला गती देण्यात आली आहे. महानिरीक्षकांच्या अहवालातही दोषीसादरेंच्या आत्महत्येनंतर एकाच वेळी आयुक्तालय व विशेष पोलीस महानिरीक्षकांची विभागीय अशी दोन स्तरावर चौकशी सुरु होती. विशेष महानिरीक्षक जयजीतसिंग यांच्या विभागीय चौकशीतही रायते यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. दिवाळीचे सोने व मिठाईची ऑडीओ क्लिप रायतेंसाठी डोकेदुखी ठरली आहे. हा अहवाल पोलीस महासंचालकांकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान,विविध राजकीय पक्ष व संघटनांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनावर कमालीचा दबाव वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रायते यांची उचलबांगडी होवू शकते, असे संकेतही एका वरिष्ठ अधिकार्याने दिले आहेत. उचलबांगडीची कुणकुण लागल्यानेच रायते रजेवर निघून गेले आहेत.चौघांची फिल्डींगस्थानिक गुन्हे शाखेचा नवा कप्तान होण्यासाठी मुक्ताईनगरचे राजेशसिंह चंदेल यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यानंतर वाहतुक शाखेचे चंद्रकांत सरोदे व एमआयडीसीचे सुनील कुराडे यांनीही आपल्या पध्दतीने दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून फिल्डींग लावली आहे. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे व पाचोर्याचे दादाराव सिनगारे यांच्याही नावाची चर्चा आहे. हिवाळी अधिवेशापुर्वी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.