शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी रावसाहेब दानवे घेणार उद्धव ठाकरेंची भेट; केले ‘हे’ भाकित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 12:36 IST

रेल्वेराज्यमंत्रीपदी रावसाहेब दानवे मुंबई-अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देकदाचित या प्रकल्पासाठी त्यांची मनस्थिती झाली असावीआमचे भेटायचे ठरले आहेदुसरीकडे दानवेंची महाविकास आघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका

नवी दिल्ली: गेल्या अनेकविध दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता केंद्रीय रेल्वेराज्यमंत्रीपदी बढती मिळालेले रावसाहेब दानवे आता मुंबई-अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. (raosaheb danve to be meet cm uddhav thackeray for mumbai ahmedabad bullet train)

“राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण महाराष्ट्र गेले २० वर्षे बघतोय”; मनसेचा पलटवार

रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात रावसाहेब दानवे यांनीच माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मला ८ दिवसांपूर्वी फोन केला. माझेही दोनदा बोलणे झाले आहे. मी त्यांना भेटायला जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी त्यांना भेटणार आहे. कदाचित या प्रकल्पासाठी त्यांची मनस्थिती झाली असावी. पण बोलल्यानंतर मला कळेल. आमचे भेटायचे ठरले आहे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. 

चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण

अमर, अकबर, अँथनीसारखी यांची तीन तोंडे तीन दिशेला

दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल, असे भाकित रावसाहेब दानवे यांनी वर्तवले आहे. हे तीन पक्षांचे सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारे सरकार आहे. अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडे आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाही, असे दानवे यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

Adani ग्रुपचा आता राज्याच्या व्यापारी मार्गावरही ताबा; ‘या’ कंपनीशी १६८० कोटींचा व्यवहार

दरम्यान, सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढले, तर माणसांना पूर्ण वेळ बसावेच लागते. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू, असे दानवे म्हणाले. तसेच महाराष्ट्रात भाजपासोबत काडीमोड घेऊन शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन पक्षांचे सरकार स्थापन केले. मात्र, सुरुवातीपासूनच राज्यात भाजपकडून सरकार कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, सरकार आपोआपच पडेल, असं देखील भाजपाकडून सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनraosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार