शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मथुरा हिंसाचारातील मुख्य आरोपी रामवृक्ष यादव ठार

By admin | Updated: June 4, 2016 19:59 IST

मथुरा हिंसाचारातील मुख्य आरोपी रामवृक्ष यादव ठार झाला असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे डीजीपी जावेद अहमद यांनी दिली आ

ऑनलाइन लोकमत - 
थुरा, दि. 04 - मथुरा हिंसाचारातील मुख्य आरोपी रामवृक्ष यादव ठार झाला असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे डीजीपी जावेद अहमद यांनी दिली आहे. जावेद अहमद यांनी ट्टिवटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मथुरा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या काहीजणांची ओळख पटली आहे. रामवृक्ष यादवच्या साथीदारांनी मृतदेहाची ओळख पटवली असून कुटुंबाला कळवण्यात आल्याचं जावेद अहमद यांनी सांगितलं आहे. अतिक्रमणक हटवताना मथुरामध्ये झालेल्या चकमकीत 24 जणांचा मृत्यू झाला असून रामवृक्ष यादव यातील मुख्य आरोपी होता. 
 
काय आहे घटना -
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांचे पथक अतिक्रमणकर्त्यांना हटविण्यासाठी परिसराची पाहणी करण्यासाठी पोहोचले असता, अवैध कब्जा करणाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक सुरू केली होती. त्यात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि ठाणेदार संतोष यादव यांचा मृत्यू झाला होता. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या आणि लाठीमार केला. पण आंदोलनकर्त्यांनी तेथे ठेवलेले गॅस सिलिंडर आणि दारूगोळ्याला आग लावली. त्यामुळे स्फोट झाले.
 
 
या हिंसाचारात २२ दंगलखोर ठार झाले होते, यापैकी ११ जण आगीत मृत्युमुखी पडले. मृतांचा आकडा सध्या 24 वर पोहोचला आहे. घटनास्थळावरून ४७ पिस्तुले, ६ रायफल्स आणि १७८ काडतुसे ताब्यात घेण्यात आली.  ३२०पेक्षा जास्त लोकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दोन मृत पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमी २३ पोलिसांना रुग्णालयात दाखल केले आहे. जवाहरबाग परिसरात सुमारे ३ हजार लोकांनी २६० एकरापेक्षा जास्त भूखंडावर दोन वर्षांपासून अवैध कब्जा केला होता. केंद्राने उत्तर प्रदेश सरकारकडून घटनेचा अहवाल मागितला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यादव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून त्यांना संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
 
चूक झाल्याची कबुली
अतिक्रमणकर्ते आणि पोलिसांतील हिंसक संघर्ष ही प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणेची चूक असल्याची कबुली अखिलेश यादव यांनी दिली. पोलिसांना हल्लेखोरांच्या तयारीबाबत माहिती नव्हती, असे सांगून ते म्हणाले की, पोलिसांनीसंपूर्ण तयारीनिशी आणि सविस्तर माहिती मिळवून तेथे जायला पाहिजे होते. आंदोलनकर्त्यांजवळ एवढे काही असेल याची त्यांना कल्पना नव्हती.