शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रामसेतू काल्पनिक नाही? सेतूच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 14:18 IST

भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूवरून आतापर्यंत आपल्या देशात अनेक वादविवाद झाले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमधील पाल्कच्या सामुद्रधुनीत असलेल्या सेतूबाबत आता मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूवरून आतापर्यंत आपल्या देशात अनेक वादविवाद झाले आहेत. देशातील हिंदुत्ववादी संघटना रामायण आणि रामचरित मानसामध्ये उल्लेख असलेला कथित रामसेतू हाच असल्याचा दावा करतो. तर विज्ञानवादी मंडळी ही केवळ कल्पना असून, असा कोणताही सेतू नसल्याचे सांगत असते.  दरम्यान, दोन्ही देशांमधील पाल्कच्या सामुद्रधुनीत असलेल्या सेतूबाबत आता मोठा गौप्यस्फोट झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान असलेल्या या सेतूबाबत विज्ञानविषयक कार्यक्रम तयार करणाऱ्य  अमेरिकेच्या एका सायन्स चॅनेलचे शास्त्रज्ञ आणि पुरातत्व विभागाने तयार केलेला अहवाल समोर आला आहे. या चॅनेलने रामसेतूच्या अस्तित्वाविषयी पुराव्यासह दावा केला आहे. रामसेतू हा पूर्णपणे काल्पनिक नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 30 मैल क्षेत्रावर परसलेली वाळू पूर्णपणे नैसर्गिक आहे. मात्र  येथे असलेले दगड सुमारे 7 हजार वर्षे जुने असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.   हिंदू धर्मग्रंथांनुसार श्रीरामांनी लंकेवर स्वारी करताना रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या भूमीपर्यंत दगडांचा सेतू बांधल्याचा उल्लेख आहे. समुद्रात असलेल्या या सेतूची खोली ही 3 फुटांपासून 30 फुटांपर्यंत आहे. भारतात याला रामसेतू तर जगभरात अॅडम्स ब्रिज या नावाने ओळखले जाते.  2007 साली ही दगडांची मालिका तोडून जहाजांसाठी मार्ग बनवण्याचा घाट सरकारने घातला होता. तसेच रामसेतूबाबत काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्रावरून मोठा वादही झाला होता.  रामसेतूबाबत शास्त्रज्ञांचा दावा - रामसेतू हा पूर्णपणे काल्पनिक नाही- हिंदू धर्मग्रंथांनुसार प्रभू श्रीरामांनी असाच सेतू बनवल्याचा उल्लेख- येथे असलेले दगड सुमारे 7 हजार वर्षे जुने - हा सेतू नैसर्गिक नाही मानवनिर्मित- रामसेतूवरील दगड प्राचीन आणि इतरांपेक्षा वेगळे- रामसेतूसाठी वापरलेले दगड दुसरीकडून आणण्यात आले असावेत   

टॅग्स :HinduismहिंदुइझमIndiaभारतSri Lankaश्रीलंका