शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

देशभरात श्रीराम नवमीची धामधूम; बंगालसह अनेक राज्यात हाय अलर्ट; सुरक्षादल तैनात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:07 IST

Ramnavami : श्रीराम नवमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Ramnavami : श्रीराम नवमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यापासून राननवमीला नवचैनत्य प्राप्त झाले आहे. दरम्यान, यानिमित्ताने देशभरात सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे, विशेषत: ज्या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जातीय तणाव दिसून आला आहे, त्या राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. यूपी, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. गरज वाटेल तिथे, जास्तीचा फौजफाटा तैनात करुन शांतता राखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

उत्तर प्रदेशरामनवमीनिमित्त उत्तर प्रदेशातील अयोध्या शहर विशेषत: सुरक्षेबाबत सतर्क आहे. हे प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असल्याने येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी राम मंदिराभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अयोध्येला वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आले असून, सर्व झोनमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. सरयू नदीच्या आसपास एनडीआरएफ आणि जल पोलीस सतर्क आहेत.

राज्याच्या इतर भागातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. प्रमुख रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच सोशल मीडियावर देखरेख वाढवण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अफवा किंवा भडकाऊ कंटेट पसरवण्यापासून रोखता येईल. कोणत्याही असामाजिक घटकाने हिंसाचार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

महाराष्ट्रराम नवमीनिमित्ताने राजधानी मुंबईत 13,500 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत, ज्यात 11,000 कॉन्स्टेबल, 2,500 अधिकारी आणि 51 सहायक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. शांतता राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल (SRPF) आणि इतर विशेष तुकड्यांच्या नऊ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईसह राज्यातील विविध लहान-मोठ्या शहरांमध्ये पोलिस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

पश्चिम बंगाल

रामनवमीनिमित्त पश्चिम बंगालमध्येही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोलकातामध्ये पाच मोठ्या मिरवणुकांसह 50 हून अधिक लहान मिरवणुका निघण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शहरात अतिरिक्त पाच हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हावडा, सिलीगुडी, मालदा आणि मुर्शिदाबाद या राज्यातील विविध जिल्ह्यांतील संवेदनशील भागात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी फ्लॅग मार्च काढून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली जाईल, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. गेल्या काही वर्षांपासून राज्यात रामनवमीच्या मुहूर्तावर जातीय तणावाच्या घटना उघडकीस आल्या असून, या वेळी सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

झारखंड

झारखंडमध्येही रामनवमीनिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही समाजविघातक कारवायांना वेळीच आळा घालता यावा यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाईक रॅलीसारखी कोणतीही नवीन परंपरा बंद करा, ज्यामुळे वातावरण बिघडण्याचा धोका आहे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिले आहेत. रामनवमीच्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात याची काळजी राज्यातील प्रशासनाने घेतली आहे. झारखंडमध्ये पोलीस सतर्क असून सुरक्षा व्यवस्था वाढवल्याने प्रशासन या उत्सवाबाबत पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसून येते.

बिहारबिहारमध्येही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राजधानीत रामनवमीनिमित्त पाटणा पोलिसांनी सुरक्षेसाठी ठोस तयारी केली आहे. उत्सवादरम्यान परिसरात 2500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या दोन कंपन्यांसह 800 अतिरिक्त फौजाही तैनात करण्यात आल्या आहेत. इतर राज्यांमध्येही कुठलाही अनिचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Ram Navamiराम नवमीMaharashtraमहाराष्ट्रwest bengalपश्चिम बंगालUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार