शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रामदास आठवलेंचा प्रज्ञा सिंहांच्या उमेदवारीला विरोध, मोदी सरकारला 'घरचा अहेर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 11:08 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

भोपाळः राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)ती मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रामदास आठवले म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोटात त्यांचं(प्रज्ञा सिंह) नाव होतं आणि तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे या प्रकरणात सबळ पुरावे होते. दहशतवाद्यांशी लढताना करकरे शहीद झाले. करकरे यांच्या संदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी त्या विधानाचा निषेध करतो. आता न्यायालयाचं ठरवायचं आहे काय योग्य आणि काय अयोग्य आहे.प्रज्ञा सिंह म्हणाल्या होत्या की, करकरे 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, कारण 2008मध्ये मालेगाव स्फोटाच्या चौकशीदरम्यान त्यांनी माझा छळ केला होता, तेव्हा मी त्यांना शाप दिला होता. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यावर आठवले म्हणाले, जर आमच्या पक्षाला निर्णय घ्यायचा असता तर आम्ही कधीच त्यांना उमेदवारी दिली नसती.

लोकसभा निवडणूक 2019वरही आठवलेंनी भाष्य केलं. यंदाच्या निवडणुकीत एनडीए 350 जागा जिंकणार आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास मला चांगल्या दर्जाचं मंत्रिपद मिळेल. त्याच दरम्यान पत्रकारांनी तुम्हाला संरक्षण मंत्री केल्यास तुम्ही पाकिस्तानबद्दल काय भूमिका घ्याल, असं विचारलं. त्यावर आठवले म्हणाले, शेजारील देशांनी भारतावर हल्ला केल्यास आम्ही त्यांना हल्ल्यानंच प्रत्युत्तर देऊ,

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक