शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:09 IST

Ramdas Athawale Eknath Shinde Devendra Fadnavis: महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असून, एकनाथ शिंदेंनीही इच्छुक असल्याची चर्चा आहे.

Ramdas Athawale Eknath Shinde News: "महाराष्ट्रातील वाद लवकर संपला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष खूप चांगलं काम केलं आहे. आताही त्यांनी ५७ जागा निवडून आणल्या आहेत. भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. भाजपचे म्हणणे असे आहे की, एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली पाहिजे", अशी भूमिका मांडत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासाठी नवा तोडगा सुचवला. 

दिल्लीत माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं, असं भाजपच्या वरिष्ठांनी निश्चित केलं आहे. एकनाथ शिंदे थोडे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रातील यशात एकनाथ शिंदेंची मोठी भूमिका राहिली आहे", असे भाष्य रामदास आठवलेंनी केली.  

फडणवीसांनी चार पावलं मागे घेतली, आता शिंदेंनी...

"आता भाजपकडे इतक्या जागा आहेत की, ते तयार होणार नाहीत. एकनाथ शिंदेंनी आता दोन पावलं मागे घ्यायला हवीत, जसं देवेंद्र फडणवीस यांनी चार पावले मागे आले होते. त्यांनी (देवेंद्र फडणवीस) त्यांच्या (एकनाथ शिंदे) नेतृत्वाखाली काम केलं", असा सल्ला रामदास आठवलेंनी एकनाथ शिंदेंना दिला.  

"एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं. उपमुख्यमंत्री होणं, त्यांना योग्य वाटत नसेल, तर त्यांनी केंद्रात मंत्री व्हावे, असा माझा त्यांना सल्ला आहे. याचा मोदीजी, अमित शाहाजी याचा विचार करतील. पटकन निर्णय व्हायला हवा. नाराजी चांगली नाहीये", असे रामदास आठवले लांबलेल्या निर्णयावर म्हणाले. 

आरपीआयला मंत्रीपद देण्याचे वचन -रामदास आठवले

"एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ५७ आमदारांची आम्हाला गरज आहे. महायुती म्हणून आम्ही पुढे गेलं पाहिजे. नाहीतर जनतेचा विश्वास उडेल. जनतेनं विश्वास ठेवला आहे. त्यामुळे लवकर तडजोडी केल्या पाहिजेत. लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा. पण, त्या मंत्रिमंडळात माझ्या पक्षालाही मंत्रिपद मिळायला हवे. मी ही मागणी आधीही केली होती. मी देवेंद्र फडणवीसांना दोन वेळा भेटलो आहे. आरपीआयला मंत्रिपद देण्याचे वचन दिले गेले आहे", असे रामदास आठवले म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेRamdas Athawaleरामदास आठवलेMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस