शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:09 IST

Ramdas Athawale Eknath Shinde Devendra Fadnavis: महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असून, एकनाथ शिंदेंनीही इच्छुक असल्याची चर्चा आहे.

Ramdas Athawale Eknath Shinde News: "महाराष्ट्रातील वाद लवकर संपला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष खूप चांगलं काम केलं आहे. आताही त्यांनी ५७ जागा निवडून आणल्या आहेत. भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. भाजपचे म्हणणे असे आहे की, एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली पाहिजे", अशी भूमिका मांडत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासाठी नवा तोडगा सुचवला. 

दिल्लीत माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं, असं भाजपच्या वरिष्ठांनी निश्चित केलं आहे. एकनाथ शिंदे थोडे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रातील यशात एकनाथ शिंदेंची मोठी भूमिका राहिली आहे", असे भाष्य रामदास आठवलेंनी केली.  

फडणवीसांनी चार पावलं मागे घेतली, आता शिंदेंनी...

"आता भाजपकडे इतक्या जागा आहेत की, ते तयार होणार नाहीत. एकनाथ शिंदेंनी आता दोन पावलं मागे घ्यायला हवीत, जसं देवेंद्र फडणवीस यांनी चार पावले मागे आले होते. त्यांनी (देवेंद्र फडणवीस) त्यांच्या (एकनाथ शिंदे) नेतृत्वाखाली काम केलं", असा सल्ला रामदास आठवलेंनी एकनाथ शिंदेंना दिला.  

"एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं. उपमुख्यमंत्री होणं, त्यांना योग्य वाटत नसेल, तर त्यांनी केंद्रात मंत्री व्हावे, असा माझा त्यांना सल्ला आहे. याचा मोदीजी, अमित शाहाजी याचा विचार करतील. पटकन निर्णय व्हायला हवा. नाराजी चांगली नाहीये", असे रामदास आठवले लांबलेल्या निर्णयावर म्हणाले. 

आरपीआयला मंत्रीपद देण्याचे वचन -रामदास आठवले

"एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ५७ आमदारांची आम्हाला गरज आहे. महायुती म्हणून आम्ही पुढे गेलं पाहिजे. नाहीतर जनतेचा विश्वास उडेल. जनतेनं विश्वास ठेवला आहे. त्यामुळे लवकर तडजोडी केल्या पाहिजेत. लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा. पण, त्या मंत्रिमंडळात माझ्या पक्षालाही मंत्रिपद मिळायला हवे. मी ही मागणी आधीही केली होती. मी देवेंद्र फडणवीसांना दोन वेळा भेटलो आहे. आरपीआयला मंत्रिपद देण्याचे वचन दिले गेले आहे", असे रामदास आठवले म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेRamdas Athawaleरामदास आठवलेMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस