शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:09 IST

Ramdas Athawale Eknath Shinde Devendra Fadnavis: महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असून, एकनाथ शिंदेंनीही इच्छुक असल्याची चर्चा आहे.

Ramdas Athawale Eknath Shinde News: "महाराष्ट्रातील वाद लवकर संपला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष खूप चांगलं काम केलं आहे. आताही त्यांनी ५७ जागा निवडून आणल्या आहेत. भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. भाजपचे म्हणणे असे आहे की, एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली पाहिजे", अशी भूमिका मांडत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासाठी नवा तोडगा सुचवला. 

दिल्लीत माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं, असं भाजपच्या वरिष्ठांनी निश्चित केलं आहे. एकनाथ शिंदे थोडे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रातील यशात एकनाथ शिंदेंची मोठी भूमिका राहिली आहे", असे भाष्य रामदास आठवलेंनी केली.  

फडणवीसांनी चार पावलं मागे घेतली, आता शिंदेंनी...

"आता भाजपकडे इतक्या जागा आहेत की, ते तयार होणार नाहीत. एकनाथ शिंदेंनी आता दोन पावलं मागे घ्यायला हवीत, जसं देवेंद्र फडणवीस यांनी चार पावले मागे आले होते. त्यांनी (देवेंद्र फडणवीस) त्यांच्या (एकनाथ शिंदे) नेतृत्वाखाली काम केलं", असा सल्ला रामदास आठवलेंनी एकनाथ शिंदेंना दिला.  

"एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं. उपमुख्यमंत्री होणं, त्यांना योग्य वाटत नसेल, तर त्यांनी केंद्रात मंत्री व्हावे, असा माझा त्यांना सल्ला आहे. याचा मोदीजी, अमित शाहाजी याचा विचार करतील. पटकन निर्णय व्हायला हवा. नाराजी चांगली नाहीये", असे रामदास आठवले लांबलेल्या निर्णयावर म्हणाले. 

आरपीआयला मंत्रीपद देण्याचे वचन -रामदास आठवले

"एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ५७ आमदारांची आम्हाला गरज आहे. महायुती म्हणून आम्ही पुढे गेलं पाहिजे. नाहीतर जनतेचा विश्वास उडेल. जनतेनं विश्वास ठेवला आहे. त्यामुळे लवकर तडजोडी केल्या पाहिजेत. लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा. पण, त्या मंत्रिमंडळात माझ्या पक्षालाही मंत्रिपद मिळायला हवे. मी ही मागणी आधीही केली होती. मी देवेंद्र फडणवीसांना दोन वेळा भेटलो आहे. आरपीआयला मंत्रिपद देण्याचे वचन दिले गेले आहे", असे रामदास आठवले म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेRamdas Athawaleरामदास आठवलेMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस