वंचितांच्या जीवनात आनंद वाटण्याचा उत्सव रमजान ईद :
By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:02+5:302015-07-15T00:15:02+5:30
अहमदनगर : रमजानच्या महिन्यात महिनाभर उपवास करुन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्याची रक्कम गरजवंतांच्या घरी नेऊन दिली जाते़ तसेच जकात आकारुन मुस्लीम समाजातील वंचितांसाठी विविध खर्च करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे़ ईदच्या नमाजानंतर मोठ्या व्यक्तींकडून लहानांना ईदी दिली जाते़ तसेच वंचितांसाठी विविध वस्तू भेट देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याची परंपरा मुस्लीम बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे़

वंचितांच्या जीवनात आनंद वाटण्याचा उत्सव रमजान ईद :
अ मदनगर : रमजानच्या महिन्यात महिनाभर उपवास करुन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्याची रक्कम गरजवंतांच्या घरी नेऊन दिली जाते़ तसेच जकात आकारुन मुस्लीम समाजातील वंचितांसाठी विविध खर्च करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे़ ईदच्या नमाजानंतर मोठ्या व्यक्तींकडून लहानांना ईदी दिली जाते़ तसेच वंचितांसाठी विविध वस्तू भेट देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याची परंपरा मुस्लीम बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे़याबाबत माहिती देताना डॉ़ इक्राम खान म्हणाले की, रमजान ईदचे मूळ नाव ईद-उल-फित्र हे आहे़ सदका-ए- फित्र या दानापासून हे नाव तयार झाले आहे़ सदका-ए- फित्र म्हणजे ईदच्या नमाजापूर्वी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्या धान्याची रक्कम गरजवंतांना त्यांच्या घरी नेऊन द्यावी़ रमजान महिन्यात महिनाभर उपवास (रोजे) केले जातात़ या महिन्यात जकात कर आकारला जातो़ एकूण उत्पन्नाच्या रकमेतून ५२़५ तोळे चांदी किंवा ७़५ तोळे सोन्याचे दागिने यापेक्षा जास्त असणार्या रकमेवर २़५ टक्के रक्कम वंचितासाठी खर्च करणे आवश्यक असते़ यालाच जकात असे संबोधले जाते़ गेल्या वर्षी नगरमध्ये २२ कोटीपेक्षा जास्त जकात जमा झाली होती़ ही रक्कम समाजातील वंचित घटकांसाठी खर्च केली जाते़ कुणी भुकेला राहू नये, कुणी असंतुष्ट असू नये यासाठी या रकमेतून विविध वस्तू खरेदी करुन दिल्या जातात़ वंचितांच्या जीवनात आनंद यावा, यासाठी त्यांना त्यांच्या घरी नेऊन दान द्यायचे असते़ वंचितांना आपल्या आनंदात सामावून घेण्याचा हा सण आहे़ रमजाननंतर येणार्या ईदला मोबदल्याचा दिवस म्हणतात़ महिनाभरातील उपवास, काम, दान पाहून प्रत्येकाला मोबदला दिला जातो़ रमजान महिन्यात दिवसभरात पाच नमाज केल्या जातात़ तर ईदच्या दिवशी सहा नमाज करण्याची प्रथा आहे़ नमाज झाल्यानंतर एकमेकांच्या गळाभेटी घेऊन ज्यांच्या घरी कुणी मयत झाले असेल त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले जाते़ त्यांना खाऊ घातले जाते आणि मग स्वत:च्या घरी जाण्याची परंपरा ईदच्या दिवशी आहे़ रमजान हा निव्वळ आनंद साजरा करण्याचा महिना नाही, तर तो इतरांचे दु:ख हलके करण्याचाही महिना आहे़ ईद साजरी करण्याच्या प्रथा जगभर वेगवेगळ्या आहेत़ भारतात दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जातात़ (जोड आहे)