शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रमजान : इस्लाम धर्मातील पवित्र महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 01:05 IST

नमाज हाही एक प्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते.

- हुसेन मेमन, जव्हार

स्लामिक महिने चान्द्रिक कालगणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरुवात देखील चंद्र दर्शनाने होते. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते, याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे. म्हणूनच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नतचे (स्वर्ग ) दार उघडले जातात व जहन्नमचे (नरक) दार बंद केले जाते. आणि त्यानंतर सूचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे, त्यांनी पुढे व्हावे आणि जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत, त्यांनी त्यापासून लांब थांबावे.

या महिन्यातील प्रमुख गोष्टी :१. रोजा, २. नमाज, तराविहची विशेष नमाज, ३. शबे कद्रची रात्र ४. कुरआन ५. जकातुल फित्र१. रोजा (उपवास) - रोजा म्हणजे पहाटे सूर्योदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न-पाण्याचा एक कणसुद्धा खाणे-पिणे वर्ज्य असते. असे पूर्ण महिनाभर ३० दिवस चालते.

‘रोजा’मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्षे चालणाºया मशीनला, गाडीला वर्षातून एकदा का होईना सर्व्हिसिंग करून घेतो. जेणेकरून गाडीचे, मशीनचे आयुष्य वाढते. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्न प्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीररूपी मशीन सर्व्हिसिंग होऊन आणखी चांगले कार्य करावे म्हणून रोजा केला जातो. यामुळे शरीराची अन्न प्रक्रिया आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

रोजा ठेवलेल्यांच्या पोटात काही नसल्याने पोटात एक प्रकारची ऊर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिकरीत्या कमी होते. म्हणजेच रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंताला गरिबीची जाणीव करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवण न करता एक वेळ जेऊन उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात, त्या वेदनांची जाणीव श्रीमंताला या रोजामुळे होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात.

श्रीमंत लोकांच्या मनात गरिबाबद्दल आदर, दया, आस्था व करुणाची भावना या रोजामुळे निर्माण होते. याचा परिणाम अन्नधान्य, दानधर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पेल्यात पडून बºयाच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजादारांना या रमजानच्या रोजामुळे होते.

रोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती (उदा. कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवू शकतो. अशा व्यक्ती, प्रवासी, कमीत कमी सात वर्ष, अकरा वर्ष वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांच्यावर माफ करण्यात आला आहे.२. तराविह (रात्रीची विशेष नमाज) : मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजरची नमाज, दुपारी जोहरची नमाज, दुपारी असरची नमाज (सूर्यास्ताच्या अगोदर), सायंकाळी मगरीबची नमाज आणि रात्री इशाची नमाज असे एकूण पाच नमाजआहेत.

नमाज हाही एक प्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. आपल्याला नमाजची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहू अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब, सर्व जण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरिक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविहची विशेष अशी नमाज पूर्ण महिनाभर होते. विविध मस्जिदीत या तराविहची विशेष नमाज मध्ये रोज कुरआणाचे पठण केले जाते.

३. शब-ऐ-कद्र (पवित्र रात्र) : सर्वात पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले.‘आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे.’(दिव्य कुरआन ९७:१)या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजीच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते किंबहुना इतर दिवसांच्या १००० महिन्यांच्या तुलनेत देखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.‘कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.’(दिव्य कुरआन ९७:३)

या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्त्व आहे, जो कोणी खºया भक्तिभावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्चाताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली तर नक्कीच गुन्ह्यांची माफी मिळते, परंतु अट ही असते की, एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.

४. कुरआन : इस्लाम धर्माचा सर्व श्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल्लाहू अलैही व सल्लम यांच्यावर अल्लाहकडून उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शन आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला. ‘रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी.’(दिव्य कुरआन २:१८५)

जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी ३० खंड, ११४ अध्यायमध्ये करण्यात आली आहे. यात ६००० पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे १००० पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.

कुराण हा पवित्र ग्रंथ असून ता कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वत: अल्लाहने स्वीकारलेली आहे. याच प्रमुख कारणामुळे आज चौदाशे-साडेचौदाशे वर्ष लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्रात कोणताही बदल झालेला नाही आणि ईन्शाअल्लाह कयामतपर्यंत होणारही नाही.

‘उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वत: याचे संरक्षक आहोत.’(दिव्य कुरआन १५:९)

५.जकातुल फित्र (दानधर्म) -हा या महिन्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. जकातूल फित्र म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत, सधन आणि कमीत कमी चांगली आर्थिक परिस्थिती असणाºया कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे २.५ किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाखीची परिस्थिती असणाºया अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाची असते. जेणेकरून त्या गरीब कुटुंबाला देखील ईदच्या त्योहारामध्ये सामील होता यावे.थोडक्यात, जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटुंबे दररोज उपाशी झोपतात. अशा परिस्थितीत या जकातूल फित्रचे महत्त्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकातूल फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की, त्या कुटुंबाची वर्षभराची जेवणाची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.

वरील सर्वावरून आपल्या असे लक्षात येते की, रमजान आज रोजा म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तराविहची विशेष नमाज, शब-ऐ-कद्र (कुरआन अवतरीत झालेली रात्र), कुरआण, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे.जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल, तोच खºया अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, जुगार या अनैतिक गोष्टींपासून वाचत नसेल तर प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजेदाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.

महिनाभराच्या उपवासानंतर चंद्रदर्शन होते. त्याच्या दुसºया दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरुष, महिला, लहान-मोठे सर्वच जण सुवासिक तेल, अत्तर (इत्तर) लाऊन, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिदमध्ये जातात. या विशेष नमाजला ईद-ऊल-फितरची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजीनंतर एकमेकांना आलिंगन (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार घेतला जातो.

टॅग्स :Eid e miladईद ए मिलाद