शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

रामविलास पासवानांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 15:03 IST

रामविलास पासवान हे सतत सत्तेत राहाणारे नेते म्हणून ओळखले जातात.

मुंबई: रालोआचे एक महत्त्वाचे मंत्री म्हणून ओळखले जाणारे रामविलास पासवान यांनी केलेल्या कालच्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टी आणि रालोआने काँग्रेसप्रमाणे समाजातील सर्व स्तरांमध्य़े जाऊन सर्वसमावेशक धोरण अवलंबले पाहिजे असे विधान त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपाविरोधात राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी विविध नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केल्यानंतर रामविलास पासवान यांनीही सर्व पक्षातील दलित खासदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिले. दलित कार्डाचा वापर करुन रामविलास पासवान हे पुन्हा काही नवी खेळी किंवा बदल करु पाहतात का असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले आहेत.रामविलास पासवान हे सतत सत्तेत राहाणारे नेते म्हणून ओळखले जातात. राजकीय दिशा आणि लोकांची मानसिकता ओळखून राजकीय कंपू बदलणारे नेते अशीही त्यांची ओळख आहे. एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी या पाच सलग पंतप्रधानांच्या काळात मंत्रिपदी राहाण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. 1996 पासून आतापर्यंत काही अल्पकाळाचे अपवाद सोडल्यास त्यांच्याकडे रेल्वेमंत्रालयापासून माहिती तंत्रज्ञान खात्यापर्यंत विविध मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. २००२ साली गुजरात दंगलीनंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००४ पासून डॉ. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळवले. २००९मध्ये त्यांच्या पक्षाला सपाटून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसविरोधात आलेल्य़ा मोदी लाटेचा अंदाज घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या निर्णायाचा त्यांना चांगलाच फायदा झाला. रामविलास पासवान, त्यांचा मुलगा चिराग यांच्याबरोबर लोकजनशक्ती पार्टीचे सहा खासदार निवडून आले. आता पुन्हा मोदीलाट ओसरत असल्याचे दिसताच त्यांनी सूचक विधानं करणं सुरु केलं आहे. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग याने उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला अपयश आल्यानंतरही सूचक ट्वीट केले आहे. पासवान हे राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन निर्णय घेणारे नेते आहेत असं मत ट्वीटरवर व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहार