शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

रामविलास पासवानांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 15:03 IST

रामविलास पासवान हे सतत सत्तेत राहाणारे नेते म्हणून ओळखले जातात.

मुंबई: रालोआचे एक महत्त्वाचे मंत्री म्हणून ओळखले जाणारे रामविलास पासवान यांनी केलेल्या कालच्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टी आणि रालोआने काँग्रेसप्रमाणे समाजातील सर्व स्तरांमध्य़े जाऊन सर्वसमावेशक धोरण अवलंबले पाहिजे असे विधान त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपाविरोधात राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी विविध नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केल्यानंतर रामविलास पासवान यांनीही सर्व पक्षातील दलित खासदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिले. दलित कार्डाचा वापर करुन रामविलास पासवान हे पुन्हा काही नवी खेळी किंवा बदल करु पाहतात का असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले आहेत.रामविलास पासवान हे सतत सत्तेत राहाणारे नेते म्हणून ओळखले जातात. राजकीय दिशा आणि लोकांची मानसिकता ओळखून राजकीय कंपू बदलणारे नेते अशीही त्यांची ओळख आहे. एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी या पाच सलग पंतप्रधानांच्या काळात मंत्रिपदी राहाण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. 1996 पासून आतापर्यंत काही अल्पकाळाचे अपवाद सोडल्यास त्यांच्याकडे रेल्वेमंत्रालयापासून माहिती तंत्रज्ञान खात्यापर्यंत विविध मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. २००२ साली गुजरात दंगलीनंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००४ पासून डॉ. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळवले. २००९मध्ये त्यांच्या पक्षाला सपाटून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसविरोधात आलेल्य़ा मोदी लाटेचा अंदाज घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या निर्णायाचा त्यांना चांगलाच फायदा झाला. रामविलास पासवान, त्यांचा मुलगा चिराग यांच्याबरोबर लोकजनशक्ती पार्टीचे सहा खासदार निवडून आले. आता पुन्हा मोदीलाट ओसरत असल्याचे दिसताच त्यांनी सूचक विधानं करणं सुरु केलं आहे. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग याने उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला अपयश आल्यानंतरही सूचक ट्वीट केले आहे. पासवान हे राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन निर्णय घेणारे नेते आहेत असं मत ट्वीटरवर व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहार