शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Ram Setu: तो रामसेतूच आहे का? मोदी सरकारचे संसदेत धक्कादायक उत्तर, मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 10:30 IST

Ram Setu: रामसेतूबाबत भाजपाने विरोधात असताना आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, रामसेतूबाबत केंद्रातील मोदी सरकारने संसदेत धक्कादायक उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंकेदरम्यान हिंदी महासागरामध्ये राम सेतू असल्याच्या दाव्यावरून वेळोवेळी वादविवाद होत असतात. दरम्यान, रामसेतूबाबत भाजपाने विरोधात असताना आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, रामसेतूबाबत केंद्रातील मोदी सरकारने संसदेत धक्कादायक उत्तर दिले आहे. हरियाणामधील राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा यांनी रामसेतूबाबत प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार आपल्या गौरवशाली इतिहासाबाबत काही शास्त्रीय शोध घेत आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, राम सेतूच्या अस्तित्वाबाबत कुठलाही सबळ पुरावा नाही आहे. 

जितेंद्र सिंह म्हणाले की, आमच्या खासदाराने रामसेतूबाबत प्रश्न विचारला त्याबाबत मला आनंद आहे. मात्र या मुद्द्याबाबत आमच्या काही मर्यादा आहेत. कारण हा सुमारे १८ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. ज्या सेतूबाबत चर्चा होत आहे तो सुमारे ५६ किमी लांब होता. स्पेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समुद्रामध्ये दगडांचे काही तुकडे दिसून आले आहेत. तसेच त्यामधील काही आकृत्यांमध्ये सातत्य आहे, याचा शोध आम्ही घेतला आहे. समुद्रामध्ये काही बेटे आणि चुनखडकासारख्या काही गोष्टी दिसल्या आहेत. 

जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, स्पष्ट शद्बांमध्ये सांगायचं तर रामसेतूचं प्रत्यक्ष स्वरूप तिथे अस्तित्वात आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र काही संकेत असेही आहे ज्यामधून तिथे काही बांधकाम अस्तित्वात असू शकते. आम्ही प्राचीन द्वारका आणि अशा प्रकरणांच्या अभ्यासासाठी काम करत आहोत.

भारत आणि श्रीलंकेमध्ये असलेल्या रामसेतूबाबत वेगवेगळे दावे केले जात असतात. रामसेतूवरून भाजपाकडून काँग्रेसवर आरोप करण्यात येतो  की, काँग्रेस रामसेतूच्या अस्तित्वाला मान्य करत नाही. आता संसदेत सरकारने दिलेल्या उत्तरावरून हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे असून, काँग्रेस या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत आहे. 

श्रीरामांनी या सेतूची निर्मिती केली असे कोट्यवधी हिंदू मानतात. लंकेमध्ये पळवून नेण्यात आलेल्या सीतामाईला सोडवून आणण्यासाठी वानरांच्या सैनेच्या मदतीने हा पूल बांधण्यात आला असे रामायणात वर्णन केले आहे. तामिळनाडू राज्यातील पांबम बेटापासून सुरु झालेली ही खडकांची मालिका श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत जाते. सेतूसमुद्रम प्रकल्पासाठी हा पूल उद्ध्वस्त करण्य़ाचा निर्णय झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकल्पांतर्गत ८३ किमी लांबीचा कालवा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल तोडून मन्नार आणि पाल्कची सामुद्रधुनी जोडली जाणार आहे. अमेरिकेच्या एका विज्ञानविषय कार्यक्रम दाखवणाऱ्या वाहिनीने हा पूल नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे असे स्पष्ट करणारा कार्यक्रम दाखवला होता. त्यासाठी नासाच्या छायाचित्रांचा आधार घेण्याच आला होता.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारramayanरामायणIndiaभारतSri Lankaश्रीलंका