शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्यास राजीव गांधी नाही तर ही व्यक्ती जबाबदार, मणिशंकर अय्यर यांचं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 16:17 IST

Mani Shankar Iyer: अयोध्येतील बाबरी मशिदीचं ताळं उघडून पूजेला परवानगी देण्यामागे राजीव गांधी नाही तर अरुण नेहरूंचा हात होता, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे. 

 अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असतानाच त्यावरून राजकारणही जोरात सुरू झालं आहे. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनीही या विषयी एक मोठा दावा केला आहे, त्यावरून आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटू शकते. अयोध्येतील बाबरी मशिदीचं कुलूप उघडून पूजेला परवानगी देण्यामागे राजीव गांधी नाही तर अरुण नेहरूंचा हात होता, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे. 

२०२४ ची लोकसभा निवडणूक तोंडांवर असताना मणिशंकर अय्यर यांच्या पुस्तकाचीही चर्चा सुरू आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की, बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्याबाबतचा दोष राजीव गांधी यांना देता कामा नये. तर त्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं पाहिजे. हे कुलूप उघडलं गेलं आणि मोठ्या संख्येने हिंदू भाविकांना गोळा केलं गेलं.  

मणिशंकर अय्यर या पुस्तकात अंदाज वर्तवताना लिहितात की, जर राजीव गांधी जीवित असते आणि नरसिंह राव यांच्या जागी पंतप्रधान असते तर बाबरी मशीद अजूनही तिथेच उभी राहिली असती. भाजपालाही योग्य उत्तर दिलं गेलं असतं. तसेच आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जसा निकाल दिला तसाच कुठला तरी तोडगा निघाला असता.

दरम्यान, २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारण्याच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाचे मणिशंकर अय्यर यांनी कौतुक केले आहे. मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या ‘द राजीव आय न्यू अँड व्हाय ही वॉझ इंडियाज मोस्ट मिसअंडरस्टुड प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचं अनावरण करताना वरील मत मांडलं आहे.  

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या