शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्यास राजीव गांधी नाही तर ही व्यक्ती जबाबदार, मणिशंकर अय्यर यांचं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 16:17 IST

Mani Shankar Iyer: अयोध्येतील बाबरी मशिदीचं ताळं उघडून पूजेला परवानगी देण्यामागे राजीव गांधी नाही तर अरुण नेहरूंचा हात होता, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे. 

 अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असतानाच त्यावरून राजकारणही जोरात सुरू झालं आहे. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनीही या विषयी एक मोठा दावा केला आहे, त्यावरून आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटू शकते. अयोध्येतील बाबरी मशिदीचं कुलूप उघडून पूजेला परवानगी देण्यामागे राजीव गांधी नाही तर अरुण नेहरूंचा हात होता, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे. 

२०२४ ची लोकसभा निवडणूक तोंडांवर असताना मणिशंकर अय्यर यांच्या पुस्तकाचीही चर्चा सुरू आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की, बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्याबाबतचा दोष राजीव गांधी यांना देता कामा नये. तर त्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं पाहिजे. हे कुलूप उघडलं गेलं आणि मोठ्या संख्येने हिंदू भाविकांना गोळा केलं गेलं.  

मणिशंकर अय्यर या पुस्तकात अंदाज वर्तवताना लिहितात की, जर राजीव गांधी जीवित असते आणि नरसिंह राव यांच्या जागी पंतप्रधान असते तर बाबरी मशीद अजूनही तिथेच उभी राहिली असती. भाजपालाही योग्य उत्तर दिलं गेलं असतं. तसेच आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जसा निकाल दिला तसाच कुठला तरी तोडगा निघाला असता.

दरम्यान, २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारण्याच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाचे मणिशंकर अय्यर यांनी कौतुक केले आहे. मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या ‘द राजीव आय न्यू अँड व्हाय ही वॉझ इंडियाज मोस्ट मिसअंडरस्टुड प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचं अनावरण करताना वरील मत मांडलं आहे.  

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या