शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा: तिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार एक लाख लाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:28 IST

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी तिरुपती देवस्थानमधील प्रसिद्ध लाडू अयोध्येत पाठवले जाणार आहेत.

Ram Mandir inauguration: प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. याच दिवशी प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होईल. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, हा सोहळा खास बनवण्यासाठी दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD)  अयोध्येला एक लाख लाडू पाठवणार आहे.

तिरुपती देवस्थानचे लाडू खूप खास असतात, भाविकांमध्ये या लाडूंची प्रचंड मागणी असते. यामुळेच तिरुपती मंदिराने पाठवलेले लाडू अयोध्येत येणाऱ्या राम भक्तांमध्ये वाटण्यात येणार असल्याचे टीटीडीने म्हटले आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून लाखो भाविक 22 तारखेला अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, तिरुपतीमध्ये भाविकांमध्ये वाटल्या जाणाऱ्या लाडूंचे वजन 176 ग्रॅम ते 200 ग्रॅम असते. पण, अयोध्येला पाठवल्या जाणाऱ्या छोट्या लाडूंचे वजन फक्त 25 ग्रॅम असेल. हे लाडू फक्त तिरुमला मंदिराच्या खास स्वयंपाकघरात तयार केले जातील. या स्वयंपाकघरात भगवान व्यंकटेश्वर स्वामींसाठी प्रसाद तयार केला जातो. 

टीटीडीचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी म्हणाले की, अयोध्येत येणाऱ्या भाविकांना वाटण्यासाठी आम्ही एक लाख लाडू बनवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आम्हालाही हातभार लावायचा आहे, म्हणूनच आम्ही खास प्रसाद पाठवत आहोत. सर्व लाडू तयार झाल्यावर ते अयोध्येला पाठवले जातील. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट