शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे तर...' लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 21:52 IST

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी काय म्हणाले, पाहा...

Ram Mandir Inauguration: अयोध्येत येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन आणि रामललाचा प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) सोहळा होत आहे. तत्पुर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिर आंदोलनाची ज्वाला पेटवणारे लालकृष्ण अडवाणी (Lal Krish Advani) यांचे महत्त्वपूर्ण विधान समोर आले आहे. या सोहळ्यांना त्यांनी दिव्य स्वप्नाची पूर्तता म्हटले आणि रामललाच्या अभिषेकाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असल्याचेही सांगितले. 

लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांनी राष्ट्रधर्म या हिंदी मासिकाशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी भव्य राम मंदिर बांधल्याबद्दल आणि हा संकल्प पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केले. यावेळी अडवाणी यांनी त्यांच्या रथयात्रेचाही उल्लेख केला आहे. अडवाणी म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे नियतीनेच ठरवले होते. रथयात्रा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी मला समजले की मी फक्त एक सारथी आहे. हा रथ स्वतःच रथयात्रेचा मुख्य संदेशवाहक आहे. 

पंतप्रधान मोदींचे आभार मानले

दरम्यान, अडवाणी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली आणि प्राण प्रतिष्ठाच्या भव्य कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती जाणवत असल्याचे सांगितले. जुन्या काळाची आठवण करुन अडवाणी म्हणाले की, आज रथयात्रेला 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 सप्टेंबर 1990 रोजी सकाळी रथयात्रेला सुरुवात करताना वाटले नव्हते की, ही यात्रा देशव्यापी चळवळीचे रुप घेईल. विशेष म्हणजे, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अडवाणींचे सहाय्यक होते आणि संपूर्ण रथयात्रेत सोबत राहिले. 

रथयात्रेद्वारे देशभरात फिरत होतो, तेव्हा अनेक लोक मला भेटायचे. तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला राम मंदिराचे स्वप्न दिसायचे. त्यांनी अनेक वर्षे आपल्या इच्छा मनात दाबू ठेवल्या होत्या. आता 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होत आहे आणि यातून देशातील लाखो करोडो रामभक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामललाच अभिषेक करतील, तेव्हा ते भारतातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतील. मी प्रार्थना करतो की हे मंदिर सर्व भारतीयांना श्रीरामाचे गुण अंगीकारण्याची प्रेरणा देईल, असं अडवणी यावेळी म्हणाले.

लालकृष्ण अडवणींची रथयात्राभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी यांनी आपल्या रथयात्रेतून राम मंदिर आंदोलनाची ज्योत पेटवली. 25 सप्टेंबर 1990 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सोमनाथ ते अयोध्येपर्यंत 10 राज्यांतून निघालेल्या अडवाणींच्या यात्रेने लोकांमध्ये राम मंदिराचे बीज पेरले होते. 10 हजार किलोमीटरच्या या रथयात्रेने देशातील लोकांमध्ये लपलेले हिंदुत्व जागृत केले. आज त्या रथयात्रेचे फळ देशातील करोडो राम भक्तांना मिळत आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा