शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

सरकार कोणाचंही आलं तरी राम मंदिर होणारच- भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 08:19 IST

राम मंदिराबद्दल मोहन भागवत यांचं महत्त्वपूर्ण विधान

देहरादून: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. 2014 मध्ये राम मंदिराचा मुद्दा नव्हता. तेव्हा राम मंदिराचा मुद्दा नसता, तरीही सरकार स्थापन झालं असतं. मात्र 2019 मध्ये भाजपा राम मंदिर सर्वात महत्त्वाचा विषय आहे, असं भागवत यांनी म्हटलं. ते देहरादूनमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 2014 मध्ये देशात एक दुसरी लाट होती. ती राम मंदिरापेक्षा वेगळी होती. मात्र यावेळी राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. भगवान राम आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहेत. सरकार कोणाचंही येवो, राम मंदिराची उभारणी व्हायलाच हवी. असं न झाल्यास संतांशी चर्चा करुन आम्ही योग्य ती कार्यवाही करु, असं सूचक विधान सरसंघचालकांनी केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर काही इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,' असं भागवत म्हणाले. नितीन गडकरींनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विधानं केली आहेत. लोकांनी दाखवलेली स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, तर लोक धुलाई करतात, असं गडकरींनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यावेळी गडकरींचा निशाणा पंतप्रधान मोदींवर असल्याची चर्चा झाली होती. मोहन भागवत यांनी आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिकादेखील स्पष्ट केली. मी कायम आरक्षणाच्या बाजूनं आहे. मात्र आरक्षण जाती आणि धर्माच्या आधारे न देता ते गरजूंना द्यायला हवं, असं भागवत म्हणाले. आरक्षणामागचं राजकारण मुख्य समस्या असल्याचंही त्यांनी म्हटलं. याआधी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीवेळी भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यावेळी संघाला आरक्षण संपवायचं आहे, असा प्रचार जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी केला होता. याचा मोठा फटका भाजपाला निवडणुकीत बसला अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९