शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

सरकार कोणाचंही आलं तरी राम मंदिर होणारच- भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 08:19 IST

राम मंदिराबद्दल मोहन भागवत यांचं महत्त्वपूर्ण विधान

देहरादून: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. 2014 मध्ये राम मंदिराचा मुद्दा नव्हता. तेव्हा राम मंदिराचा मुद्दा नसता, तरीही सरकार स्थापन झालं असतं. मात्र 2019 मध्ये भाजपा राम मंदिर सर्वात महत्त्वाचा विषय आहे, असं भागवत यांनी म्हटलं. ते देहरादूनमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 2014 मध्ये देशात एक दुसरी लाट होती. ती राम मंदिरापेक्षा वेगळी होती. मात्र यावेळी राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. भगवान राम आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहेत. सरकार कोणाचंही येवो, राम मंदिराची उभारणी व्हायलाच हवी. असं न झाल्यास संतांशी चर्चा करुन आम्ही योग्य ती कार्यवाही करु, असं सूचक विधान सरसंघचालकांनी केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर काही इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,' असं भागवत म्हणाले. नितीन गडकरींनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विधानं केली आहेत. लोकांनी दाखवलेली स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, तर लोक धुलाई करतात, असं गडकरींनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यावेळी गडकरींचा निशाणा पंतप्रधान मोदींवर असल्याची चर्चा झाली होती. मोहन भागवत यांनी आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिकादेखील स्पष्ट केली. मी कायम आरक्षणाच्या बाजूनं आहे. मात्र आरक्षण जाती आणि धर्माच्या आधारे न देता ते गरजूंना द्यायला हवं, असं भागवत म्हणाले. आरक्षणामागचं राजकारण मुख्य समस्या असल्याचंही त्यांनी म्हटलं. याआधी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीवेळी भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यावेळी संघाला आरक्षण संपवायचं आहे, असा प्रचार जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी केला होता. याचा मोठा फटका भाजपाला निवडणुकीत बसला अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९