शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जे काही राहिलं आहे, ते सर्व व्यवस्थित करू; समान नागरी कायद्याबाबत अमित शाह यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 12:25 IST

शाह म्हणाले, कॉमन सिव्हिल कोड पायलट प्रोजेक्ट म्हणून उत्तराखंडमध्ये लागू केला जात आहे. ड्राफ्ट तयार केला जात आहे. जे काही राहिले आहे, ते सर्व व्यवस्थित करू.

राममंदिर, कलम 370, CAA आणि ट्रिपल तलाक सारखे मुद्दे संपले. आता नंबर कॉमन सिव्हिल कोडचा (समान नागरी संहिता), असे केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. शाह शुक्रवारी भोपाळ दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी येथील भाजप कार्यालायत कोअर कमिटिची बैठक घेतली, या बैठकीत ते बोलत होते. यामुळे, आता देशात लवकरच कॉमन सिव्हिल कोड लागू होण्याची शक्यता आहे.

शाह म्हणाले, कॉमन सिव्हिल कोड पायलट प्रोजेक्ट म्हणून उत्तराखंडमध्ये लागू केला जात आहे. ड्राफ्ट तयार केला जात आहे. जे काही राहिले आहे, ते सर्व व्यवस्थित करू. पण आपण पक्षाचे नुकसान होईल, असे कुठलेही काम करू नका.तत्पूर्वी शाह यांनी, देशात सर्व काही ठीक झाले? असा प्रश्न राज्यातील वरिष्ट नेत्यांना विचारला. यानंतर, त्यांनी कॉमन सिव्हिल कोड मुद्द्यावर चर्चा केली. एवढेच नाही, तर पुढील निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील. पण काळजी करण्याचे काही कारण नाही, काँग्रेसची आणखी दयनीय अवस्था होणार आहे. कसलेही आव्हान नाही, असेही शाह म्हणाले.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. यानंतर, शाह BSF च्या विमानाने दिल्लीला परतले. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे आणि खासदार राकेश सिंह देखील त्यांच्यासोबत गेले.काय आहे कॉमन सिव्हिल कोड? थोडक्यात समजून घ्या  -कॉमन सिव्हिल कोड (समान नागरी संहिता) लागू झाल्यानंतर, देशात लग्न, घटस्फोट, वारसदार आणि दत्तक घेणे, यांसारखे सामाजिक प्रश्न एकाच कायद्यांतर्गत येतील. यात धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकराची वेगळी व्यवस्था नसेल. घटनेतील कलम 44 असा कायदा तयार करण्याची शक्ती देते. हा कायदा केवळ केंद्र सरकारच संसदेच्या माध्यमाने लागू करू शकते. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश