शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:09 IST

Raksha Bandhan Emotional Story: आज अनेकांच्या हातात राखी बांधलेली नसेल. पण वलसाडच्या रक्षाबंधनाने ज्यांना बहीण, भाऊ आहेत, त्यांच्याही डोळ्यात पाणी आणले आहे.

रक्षाबंधनाची बहीण-भाऊ आतुरतेने वाट पाहत असतात. अनेकांच्या भाग्यात बहीण नसते, अनेकांच्या भाऊ. अनेकांच्या आयुष्यातून भाऊ-बहीण निघून गेलेले असतात कायमचे. आज अनेकांच्या हातात राखी बांधलेली नसेल. पण वलसाडच्या रक्षाबंधनाने ज्यांना बहीण, भाऊ आहेत, त्यांच्याही डोळ्यात पाणी आणले आहे. हे जग सोडून गेलेल्या एकुलत्या एका बहिणीच्या जिवंत हाताने आज वलसाडमध्ये भावाला राखी बांधली आहे. 

गुजरातच्या रिया या लहान मुलीचे गेल्या वर्षी सप्टेंबर २०२४ ला निधन झाले होते. तिचा ब्रेन डेड झाला होता. तिच्या कुटुंबाने तिचे अवयव दान केले होते. याच रियाचे हात मुंबईच्या १५ वर्षीय अनमता अहमद या मुलीला जोडण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागल्याने तिला हात गमवावा लागला होता. रियाच्या खऱ्या भावाला रियाच्या खऱ्या जिवंत हाताने राखी बांधण्यासाठी अनमता मुंबईहून गुजरातला गेली होती. 

शिवमने अनमताकडून राखी बांधून घेतली तो क्षण खूप भावूक करणारा होता. यातून कोणताही धर्म नाही तर मानवतेचा धर्म सर्वात मोठा आहे, हा संदेश जगभरात देण्यात आला. शिवम दहावीत शिकतो तर अनमता ही ११वीत. एका घटनेने शिवमची बहीण त्याच्यापेक्षा मोठी झाली आहे. रियाच्या पालकांनी अनामताला घट्ट मिठी मारली. एकीकडे आपली मुलगी या जगात नाही, आपली बहीण या जगात नाही अशी भावना होती, दुसरीकडे आपल्याच मुलीचे जिवंत हात समोर दिसत होते. कसा असेल तो क्षण... रियाचे मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि कॉर्निया इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले आहे. 

टॅग्स :RakhiराखीRaksha Bandhanरक्षाबंधन