शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

Raksha bandhan 2018: जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 15:40 IST

Raksha bandhan Special: श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला बहीण आपल्या भावांकडून राखी बांधून सुरक्षेचं वचन घेते.

प्रत्येक भावा-बहिणीला ज्या गोष्टीचा प्रतिक्षा लागलेली असते तो रक्षाबंधन सण जवळ आलाय. रक्षाबंधंनाच्या उत्सवाची रेलचेल सध्या बाजारात सगळीकडे नजर टाकली तरी दिसते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला बहीण आपल्या भावांकडून राखी बांधून सुरक्षेचं वचन घेते. तर दुसरीकडे भाऊ आपल्या बहीणीला तन, मन, धनाने रक्षेचं वचन देतात.

कधी साजरा केला जातो रक्षाबंधन?

हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येकवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. यावेळी रविवारी २६ ऑगस्टला रक्षाबंधन केलं जाणार आहे. 

काय आहे आख्यायिका?

रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.

राखी बांधण्याचा मुहूर्त

सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत(26 ऑगस्ट)

पौर्णिमा तिथी सुरुवात : दुपारी ३ वाजून १६ मिनिटांनी (२५ ऑगस्ट)

पौर्णिमा तिथी समाप्त : सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी (२६ ऑगस्ट)

राखी बांधण्याची पूजा-विधी

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिला तिचं रक्षा करण्याचं वचन देतो. 

- सर्वातआधी राखीचं ताट सजवा. त्यात थोडं कुंकू, अक्षत, तांदूळ, दिवा आणि राखी ठेवा.- त्यानंतर भावाला टिळा लावून त्याच्या उजव्या हातावर रक्षा सूत्र म्हणजेच राखी बांधावी. - राखी बांधल्यानंतर भावाची आरती करावी. - त्यानंतर त्याला मिठाई खाऊ घाला. - जर भाऊ तुमच्यापेक्षा मोठा असेल तर त्याच्या पाया पडा. - जर बहीण मोठी असेल तर भावाने पाया पडावे.- राखी बांधल्यानंतर भावांनी बहिणीला भेटवस्तू दयावी. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनIndian Festivalsभारतीय सण