शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

संसदीय कामकाजात राज्यसभेची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 13:12 IST

काल संपलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेने लोकसभेपेक्षा जास्त काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यसभेने नियोजित कामकाजातील 72 टक्के कामकाज पूर्ण केले तर लोकसभेने 67 टक्केच कामकाज पूर्ण केले.

ठळक मुद्दे अहमद पटेल यांची अथक प्रयत्नांनंतर आणि अगदी अटीतटीच्या निवडणुकीतून पुन्हा निवड झाल्यामुळे राज्यसभेत कॉंग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत साधारणतः 80 टक्के सदस्य उपस्थित राहिले. राज्यसभेत 55 पेक्षा अधिक वय असणारे खासदार तरुण खासदारांपेक्षा अधिक संख्येने उपस्थित होते.

नवी दिल्ली, दि. 12- राज्यसभेत प्रबळ असणारे विरोधक, प्रत्येक मुद्द्यावर होणारी सरकारची अडवणूक, ज्येष्ठ आणि नियमांवर बोट ठेवून कामकाज चालवण्याचा आग्रह असणारे सदस्य यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये राज्यसभेपेक्षा लोकसभेत कामकाज जास्त होत असे. मात्र काल संपलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेने लोकसभेपेक्षा जास्त काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यसभेने नियोजित कामकाजातील 72 टक्के कामकाज पूर्ण केले तर लोकसभेने 67 टक्केच कामकाज पूर्ण केले.

  पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत साधारणतः 80 टक्के सदस्य उपस्थित राहिले. राज्यसभेत 55 पेक्षा अधिक वय असणारे खासदार तरुण खासदारांपेक्षा अधिक संख्येने उपस्थित होते. लोकसभेत 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या खासदारांची उपस्थिती 74 टक्के तर 40 ते 70 वर्षे वय असलेल्या खासदारांची उपस्थिती 82 टक्के होती. लोकसभेत देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील खासदारांनी जास्त प्रश्न विचारले तर राज्यसभेत प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांमध्ये उत्तर भारतीयांपेक्षा पश्चिम भारतातील खासदारांची संख्या जास्त होती. संसदेतील गोंधळामुळे लोकसभेचे 30 तास वाया गेले तर राज्यसभेचे 10 तास वाया गेले. लोकसभेत 55 ते 70 वर्षे वयोगटातील सदस्यांनी चर्चांमध्ये अधिक सहभाग घेतला तर राज्यसभेत तरुण खासदारांचा समावेश चर्चांमध्ये अधिक असल्याचे दिसून आले. लोकसभेत प्रत्येक दिवशी सरासरी 3 तर राज्यसभेत 2 प्रश्नांना उत्तरे दिली गेली. 16 व्य़ा लोकसभेतील या पावसाळी अधिवेशनात सर्वाधीक विधेयके मांडली गेली आणि मंजूरही करण्यात आली. 16 वी लोकसभा सुरु झाल्यापासून प्रत्येक वर्षी सरासरी 9 वटहुकूम काढण्यात आले आहेत. आजवरच्या 15 लोकसभांपेक्षा ही संख्या फारच जास्त आहे.

पावसाळी अधिवेशनाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चले जाव चळवळीला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्व पक्षांच्या नेत्यांनी केलेली भाषणे. सभापती सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूलचे सुगत बोस यांची भाषणे सदस्यांनी विशेष लक्ष देऊन ऐकली. महत्त्वाचे म्हणजे या काळात आरडाओरडा, घोषणाबाजीही बाजूला ठेवण्यात आली होती. कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अहमद पटेल यांची अथक प्रयत्नांनंतर आणि अगदी अटीतटीच्या निवडणुकीतून पुन्हा निवड झाल्यामुळे राज्यसभेत कॉंग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये नोटा पर्याय नसावा यासाठी कॉंग्रेसचे आनंद शर्मा यांनी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी चर्चेची मागणी केली होती मात्र हा निर्णय निर्वाचन आयोगाचा असल्याचे सांगून उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांनी त्यावर चर्चा घेण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयानेही त्याबाबत कॉंग्रेसला कोणताही दिलासा दिला नाही.