शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
3
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
4
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
5
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
6
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
7
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
8
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
9
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
10
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
11
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
12
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
13
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
14
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
15
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
16
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
17
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
18
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
19
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
20
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत ‘रालोआ’चे बहुमत होण्यास दीड वर्षाची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:39 IST

रालोआ) सरकार दमदारपणे सेकंड इनिंग्ज सुरु करण्याच्या तयारीत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने महत्वाचे कायदे मंजूर करून घेण्यासाठी या सरकारला सुरुवातीचे किमान दीड वर्ष तरी विरोधी पक्षांच्या नाकदुऱ्या काढतच कारभार करावा लागणार आहे.

नवी दिल्ली : लोकसभेत गेल्या वेळेपेक्षा जास्त बहुमत मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार दमदारपणे सेकंड इनिंग्ज सुरु करण्याच्या तयारीत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने महत्वाचे कायदे मंजूर करून घेण्यासाठी या सरकारला सुरुवातीचे किमान दीड वर्ष तरी विरोधी पक्षांच्या नाकदुऱ्या काढतच कारभार करावा लागणार आहे.सरकारचे स्थैर्य आणि मजबुती राज्यसभेतील बहुमतावर अवलंबून नसली तरी वित्त विधेयकांखेरीज अन्य कायदे या वरिष्ठ सभागृहाच्या मंजुरीशिवाय मंजूर होऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणतेही सरकार राज्यसभेतही बहुमत असल्याशिवाय आपला अ‍ॅजेंडा खºया अर्थी नेटाने राबवू शकत नाही. राज्यसभेत बहुमत नसले तर मुठभर विरोधकही सरकारचे महत्वाचे कायदे अडकवून ठेवू शकतात.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ’ची दोन व मोदींच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’चे मावळते सरकार अशा सलग तीन सरकारांना गेली १५ वर्षे राज्यसभेत बहुमत नसण्याच्या अडचणी सोसत काम करावे लागले आहे. राज्यसभेचे सदस्य राज्यांच्या विधानसभांकडून निवडले जात असल्याने या विधानसभांमध्ये कोणाचेकिती आमदार आहेत यावर राज्यसभेतील बहुमत ठरत असते.राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २४५ आहे. बहुमतासाठी १२३ सदस्यसंख्या आवश्यक आहे. ‘रालोआ’चे सध्या राज्यसभेत १०१ सदस्य आहेत. याखेरीज स्वपन दासगुप्ता, मेरी कोम आणि नरेंद्र जाधव हे तीन नामनिर्देशित सदस्य व तीन अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा असल्याने ही संख्या १०७ पर्यंत पोहोचते. केटीएस तुलसी हे आणखी एक नामनिर्देशित सदस्य पुढील काही महिन्यांत निवृत्त व्हायचे असल्याने त्यांच्या जागी आपल्यापसंतीचा सदस्य नेमून ‘रालोआ’ आपली संख्या एकने वाढवू शकेल. म्हणजेच बहुमतासाठी ‘रालोआ’ला आणखी किमान १५ सदस्यविविध राज्य विधानसभांमधून निवडून आणणे गरजेचे आहे.गेल्या वर्षभरात झालेल्या व येत्या वर्ष दीडवर्षात होणाºया विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर नोव्हेंबर २०२० पर्यंत ‘रालोआ’चे राज्यसभेत बहुमत होऊ शकेल. तोपर्यंत राज्यसभेच्या ७५ जागा रिकाम्या होणार आहेत व त्यातील किमान १९ जागा ‘रालोआ’ जिंकू शकेल, असे सध्याचे चित्र आहे.>महाराष्ट्रातून अजून किती सदस्य मिळणार?‘रालोआ’ला बहुमतासाठी आवश्यक असलेले जास्तीत जास्त सदस्य उत्तर प्रदेशातून येणे अपेक्षित आहे. याखेरीज तमिळनाडूत अण्णाद्रमुक या नव्या मित्राच्या मदतीने सहा, आसाममधून तीन तर राजस्थान, ओडिशा, कर्नाटक, मिझोराम, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधून किमान एक सदस्य ‘रालोआ’ निवडून आणू शकते. याखेरीज आॅक्टोबरमध्ये होणाºया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणे मोठे यश मिळाल्यास ‘रालोआ’ला आणखी किमान तीन सदस्य महाराष्ट्रातून मिळविता येतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा