शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत ‘रालोआ’चे बहुमत होण्यास दीड वर्षाची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:39 IST

रालोआ) सरकार दमदारपणे सेकंड इनिंग्ज सुरु करण्याच्या तयारीत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने महत्वाचे कायदे मंजूर करून घेण्यासाठी या सरकारला सुरुवातीचे किमान दीड वर्ष तरी विरोधी पक्षांच्या नाकदुऱ्या काढतच कारभार करावा लागणार आहे.

नवी दिल्ली : लोकसभेत गेल्या वेळेपेक्षा जास्त बहुमत मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार दमदारपणे सेकंड इनिंग्ज सुरु करण्याच्या तयारीत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने महत्वाचे कायदे मंजूर करून घेण्यासाठी या सरकारला सुरुवातीचे किमान दीड वर्ष तरी विरोधी पक्षांच्या नाकदुऱ्या काढतच कारभार करावा लागणार आहे.सरकारचे स्थैर्य आणि मजबुती राज्यसभेतील बहुमतावर अवलंबून नसली तरी वित्त विधेयकांखेरीज अन्य कायदे या वरिष्ठ सभागृहाच्या मंजुरीशिवाय मंजूर होऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणतेही सरकार राज्यसभेतही बहुमत असल्याशिवाय आपला अ‍ॅजेंडा खºया अर्थी नेटाने राबवू शकत नाही. राज्यसभेत बहुमत नसले तर मुठभर विरोधकही सरकारचे महत्वाचे कायदे अडकवून ठेवू शकतात.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ’ची दोन व मोदींच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’चे मावळते सरकार अशा सलग तीन सरकारांना गेली १५ वर्षे राज्यसभेत बहुमत नसण्याच्या अडचणी सोसत काम करावे लागले आहे. राज्यसभेचे सदस्य राज्यांच्या विधानसभांकडून निवडले जात असल्याने या विधानसभांमध्ये कोणाचेकिती आमदार आहेत यावर राज्यसभेतील बहुमत ठरत असते.राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २४५ आहे. बहुमतासाठी १२३ सदस्यसंख्या आवश्यक आहे. ‘रालोआ’चे सध्या राज्यसभेत १०१ सदस्य आहेत. याखेरीज स्वपन दासगुप्ता, मेरी कोम आणि नरेंद्र जाधव हे तीन नामनिर्देशित सदस्य व तीन अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा असल्याने ही संख्या १०७ पर्यंत पोहोचते. केटीएस तुलसी हे आणखी एक नामनिर्देशित सदस्य पुढील काही महिन्यांत निवृत्त व्हायचे असल्याने त्यांच्या जागी आपल्यापसंतीचा सदस्य नेमून ‘रालोआ’ आपली संख्या एकने वाढवू शकेल. म्हणजेच बहुमतासाठी ‘रालोआ’ला आणखी किमान १५ सदस्यविविध राज्य विधानसभांमधून निवडून आणणे गरजेचे आहे.गेल्या वर्षभरात झालेल्या व येत्या वर्ष दीडवर्षात होणाºया विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर नोव्हेंबर २०२० पर्यंत ‘रालोआ’चे राज्यसभेत बहुमत होऊ शकेल. तोपर्यंत राज्यसभेच्या ७५ जागा रिकाम्या होणार आहेत व त्यातील किमान १९ जागा ‘रालोआ’ जिंकू शकेल, असे सध्याचे चित्र आहे.>महाराष्ट्रातून अजून किती सदस्य मिळणार?‘रालोआ’ला बहुमतासाठी आवश्यक असलेले जास्तीत जास्त सदस्य उत्तर प्रदेशातून येणे अपेक्षित आहे. याखेरीज तमिळनाडूत अण्णाद्रमुक या नव्या मित्राच्या मदतीने सहा, आसाममधून तीन तर राजस्थान, ओडिशा, कर्नाटक, मिझोराम, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधून किमान एक सदस्य ‘रालोआ’ निवडून आणू शकते. याखेरीज आॅक्टोबरमध्ये होणाºया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणे मोठे यश मिळाल्यास ‘रालोआ’ला आणखी किमान तीन सदस्य महाराष्ट्रातून मिळविता येतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा