शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

Rajya Sabha Election 2018 : उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंगमुळे बसपाचा उमेदवार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 12:40 IST

राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी देशभरात आज निवडणूक होत आहे.

नवी दिल्ली -  राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी देशभरात आज मतदान सुरू आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. यातील  6 जागा महाराष्ट्रातून आहेत. ज्या जागांवर निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्र आणि बिहारमधील 6, मध्य प्रदेशातील 5 आणि आंध्र, ओडिशा, तेलंगणा तथा राजस्थानच्या तीन-तीन जागा, झारखंड 2, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल, हरियाणा आणि केरळसाठी प्रत्येकी एक-एक अशा जागा आहेत.  पैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय जगताचे लक्ष लागले आहे. येथे बसपाचे आमदार अनिल सिंग यांनी क्रॉस व्होटिंग केल्याने बसपा उमेदवाराच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

LIVE UPDATES :

 

 

 

10:43 AM लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभा पोटनिवडणुकीत बसपा आमदार अनिल सिंग यांनी केले क्रॉस व्होटिंग, भाजपा उमेदवाराला दिले मत   

 

राज्यसभेसाठी 8 राज्यांत झाली बिनविरोध निवड

महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात मात्र 10 जागांसाठी 11 उमेदवार उभे असल्याने तेथे निवडणूक होणे अपरिहार्य आहे. बिहारमधून भाजपातर्फे रवीशंकर प्रसाद, जनता दल (संयुक्त) चे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग, व महेंद्र प्रसाद सिंग, राजदचे मनोज सिन्हा व अश्फाक करीम आणि काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंग बिनविरोध निवडून आले.मध्य प्रदेशच्या पाच जागांसाठी थावरचंद गहलोत, धर्मेंद्र प्रधान या दोन मंत्र्यांसह अजय प्रताप सोनी व कैलाश सोनी हे भाजपाचे चार व काँग्रेसचे राजमणी पटेल हे बिनविरोध निवडून आले. गुजरातच्या चार जागांवर भाजपातर्फे पुरुषोत्तम पुपाला व मनसुख मांडविया हे केंद्रीय मंत्री तर काँग्रेसतर्फे नारण राठवा व अमी याज्ञिक बिनविरोधी विजयी झाले आहेत. या खेपेस सर्वच पक्षांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे दिसले. राजस्थानातून किरोरी मीना, भूपेंद्र यादव व मदनलाल सैनी हे तिघे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. मीना हे रविवारी भाजपामध्ये आले होते. राजस्थानात काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. राजस्थानातील एका जागेवर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचीही बिनविरोध निवड झाली. आंध्र प्रदेशातील तीन जागांवर तेलगू देसमचे सी. एम. रमेश व के. रवींद्र कुमार आणि वायएसआर काँग्रेसचे व्ही. प्रभाकर रेड्डी विजयी झाले. हरयाणातील एका जागेवर भाजपाचे डी. पी. वत्स बिनविरोध निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. तिथे भाजपाने अधिक उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होईल.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा