बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी मतदान होत आहे. सर्व जागांवर एनडीए जिंकण्याची शक्यता वाढली आहे. एआयएमआयएम आणि बसपाचा पाठिंबा घेऊनही महाआघाडीला जिंकण्यासाठी लागणाऱ्या ४१च्या आकड्यापर्यंत मजल मारता आली नाही. काँग्रेसचे तीन आणि राजदचा एक आमदार मतदान करण्यासाठी आलेच नाही. इतक्या महत्त्वाच्या निवडणुकीत चार आमदार मतदानाला न येणे, हा विरोधकांच्या एकजुटीला झटका असल्याचे मानले जात आहे.
भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी ताकद लावली. त्यामुळे विरोधकांनी आकड्यांची जुळवा जुळव केली, पण चार आमदारांनीच महाआघाडीचे गणित बिघडवले आहे. मतदानाला दांडी मारणारे हे चार नेमके कोण आहेत?
सुरेंद्र कुशवाह
वाल्मिकीनगरचे आमदार सुरेंद्र कुशवाह हे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. २०१५ मध्येही कुशवाह यांनी आरएलएसपी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर कुशवाह काँग्रेसमध्ये आले होते.
मनोज विश्वास
फारबिसगंजचे आमदार मनोज विश्वास हे २२१ मतांनी निवडणुकीत जिंकले होते. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते राजद आणि जदयू पक्षात होते. २०१९ मध्ये जदयू प्रदेशाध्यक्ष होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
मनोहर प्रसाद सिंह
मनोहर प्रसाद सिंह हे चौथ्यांदा आमदार बनले आहेत. अनुसूचित जातीतून येणारे मनोहर प्रसाद पहिल्यांदा जदयू असताना आमदार बनले होते. २०१५ मध्ये महाआघाडी बनली तेव्हा मनिहारी मतदारसंघा काँग्रेसच्या वाट्याला गेला होता. नितीश कुमारांच्या सांगण्यावरून ते काँग्रेसमध्ये गेले आणि तेव्हापासून ते काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून येत आहेत.
फैसल रहमान
माजी खासदार मोतीउर रहमान यांचे सुपुत्र असलेले फैसल रहमान हे राजदकडून राज्यसभेचे खासदारही राहिलेले आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते आमदार होते. ढाका मतदारसंघातून भाजपाच्या पवन जायस्वाल यांचा १७८ मतांनी पराभव करून ते विधानसभेत पोहोचले.
Web Summary : In Bihar, NDA likely to win Rajya Sabha seats as four Mahagathbandhan MLAs, including Congress and RJD members, skipped voting. This absence weakens opposition unity. Key absentees include Surendra Kushwaha, Manoj Vishwas, Manohar Prasad Singh and Faisal Rahman.
Web Summary : बिहार में, एनडीए के राज्यसभा सीटें जीतने की संभावना है क्योंकि कांग्रेस और राजद सदस्यों सहित चार महागठबंधन विधायक मतदान से अनुपस्थित रहे। इस अनुपस्थिति से विपक्षी एकता कमजोर होती है। सुरेंद्र कुशवाहा, मनोज विश्वास, मनोहर प्रसाद सिंह और फैसल रहमान जैसे प्रमुख अनुपस्थित थे।