शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा निवडणूक- दोन आमदारांची मते रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 19:04 IST

कॉंग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंट आणि अमित शहा दाखवल्याचा आरोप करत कॉंग्रेसने त्यांची मते रद्द करण्याची मागणी केली

अहमदाबाद, दि. 8- गुजरातमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी चाललेल्या निवडणुकीत सतत नव्या घडमोडी घडत आहेत. आज सकाळपासून बलवंतसिंग राजपूत आणि अहमद पटेल लढवत असलेल्या जागेसाठी गुजरातच्या आमदारांनी मतदान केले. मात्र कॉंग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंटला व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना दाखवल्याचा आरोप करत कॉंग्रेसने त्यांची मते रद्द करण्याची मागणी केली.

भोलाभाई आणि राघवजीभाई या दोघांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंटला दाखवल्याचे कॉंग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहील यांनी सांगितले आणि त्यांची मते रद्द करावीत अशी मागणी केली. तसेच त्यांनी मतपत्रिका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही दाखवल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ही दोन मते रद्द व्हावीत अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आज दिवसभरामध्ये 176 आमदारांनी मतदान केले. आपला विजय निश्चित होईल असा विश्वास अहमद पटेल यांनी व्यक्त केला आहे. मात्र तरिही निकाल जाहीर होईपर्यंत काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे राजकीय विश्लेशकांनी मत मांडले आहे. कॉंग्रेसचे आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातून अहमद पटेल हे कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात असल्याने ही निवडणूक कॉंग्रेससाठी अधिक प्रतिष्ठेची झाली.

अहमद पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात त्यांनी 1976 साली प्रवेश केला. 1977 पासून तीन टर्म ते लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर प्रदेश कॉंग्रेस आणि केंद्र पातळीवर त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या. जवाहर भवन ट्रस्टची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यानंतर 1993-99, 1999-2005, 2005-2011, 2011-2017 अशा सलग चार टर्म ते राज्यसभेत आहेत. संपुआ सरकारच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.