शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत जिंकलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांमुळे भाजपाचा फायदा, राज्यसभेत बळ वाढणार, कसे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:59 IST

Rajya Sabha Election: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकत दमदार कामगिरी केली होती. तसेच संख्याबळ वाढल्याने राहुल गांधी यांना लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपदही मिळालं होतं. मात्र लोकसभेत वाढलेल्या संख्याबळाचा आता काँग्रेसला राज्यसभेमध्ये तोटा होताना दिसत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकत दमदार कामगिरी केली होती. तसेच संख्याबळ वाढल्याने राहुल गांधी यांना लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपदही मिळालं होतं. मात्र लोकसभेत वाढलेल्या संख्याबळाचा आता काँग्रेसला राज्यसभेमध्ये तोटा होताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या अनेक राज्यसभा सदस्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यापैकी अनेकांनी विजयही मिळवला होता. त्यामुळे त्यांना आता राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसचं राज्यसभेतील संख्याबळ घटलं आहे. मात्र रिक्त झालेल्या जागांवर आपणे उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने या जागांवर आता काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार नाहीत. तसेच या जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. 

राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. तसेच या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचं चित्रही स्पष्ट झालेलं आहे. या जागांवर भाजपाच्या उमेदवारांची विजय निश्चित असल्याने राज्यसभेतील काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं संख्याबळ घटणार आहे. तसेच भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं संख्याबळ वाढणार असून, एनडीएला पहिल्यांदाच राज्यसभेमध्ये बहुमत मिळणार आहे. 

यावेळी राज्यसभा खासदार असलेले काँग्रेसचे अनेक नेते लोकसभेवर निवडून आले आहेत. उदाहरणच द्यायचं तर हरियाणातील दीपेंद्र हुड्डा हे त्यांच्यापैकीच एक आहेत. लोकसभेवर निवडून गेल्याने दीपेंद्र हुड्डा यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मात्र हरियाणाच्या विधानसभेत भाजपाचं बहुमत असल्याने येथे भाजपाच्या किरण चौधरी यांचा विजय होणं जवळपास निश्चित आहे. काँग्रेसने येथे उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे किरण चौधरी ह्या बिनविरोध विजयी होणे ही केवळ आता औपचारिकता आहे.  

नऊ राज्यांमधील राज्यसभेच्या १२ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा आढावा घेतल्यास ही विरोधात उमेदवार नसल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, बिहार, आसाम येथील प्रत्येकी दोन आणि हरियाणा, राजस्थान, तेलंगाणा, ओदिशा आणि त्रिपुरामधील प्रत्येकी १ अशा १२ जागांचा समावेश आहे. तसेच यापैकी ११ जागांवर बिनविरोज भाजपा आणि एनडीएच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. तर तेलंगाणामधील एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार आहे.  

सद्यस्थितीत राज्यसभेमधील २० जागा रिक्त आहेत. त्यापैका १२ जागांवर निवडणूक होत आहे. तसेच या १२ जागांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यसभेतील सदस्यसंख्या वाढून २३७ एवढी होईल. या १२ जागांसाठीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाची राज्यसभेतील सदस्यसंख्या ही ८७ वरून वाढून ९७ एवढी होईल. तसेच नियुक्त आणि अपक्ष खासदारांची संख्या जोडल्यास हा आकडा १०४ पर्यंत पोहोचतो. तर एनडीएची सदस्यसंख्या वाढून ११९ एवढी होईल. त्यामुळे २३७ सदस्य असलेल्या सभागृहात एनडीएकडे काठावरचे बहुमत असेल.   

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपा