शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत ४१ उमेदवार बिनविरोध विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 07:08 IST

Rajya Sabha Election: चार राज्यातील १६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. ज्या ४१ जागांवर बिनविरोध निवड झाली त्यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ११ जागांसह बिहार, छत्तीसगडसह ११ राज्यांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली : १५ राज्यांत ५७ जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ४१ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. चार राज्यातील १६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. ज्या ४१ जागांवर बिनविरोध निवड झाली त्यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ११ जागांसह बिहार, छत्तीसगडसह ११ राज्यांचा समावेश आहे. 

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात बिनविरोध निवडून आलेल्या ११ पैकी आठ जागांवर भाजप, तर ३ जागांवर सपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे लक्ष्मीकांत बाजपेयी, डॉ. राधामोहन दास अग्रवाल, दर्शना सिंह, संगीता यादव, बाबूराम निषाद, सुरेंद्र कुमार नागर, डॉ. के. लक्ष्मण व मिथिलेश कुमार यांचा समावेश आहे. तर, सपाचे जावेद अली, कपिल सिब्बल आणि रालोदचे जयंत चौधरी यांचा समावेश आहे.बिहार : बिहारमधून पाच जागांवर झालेल्या बिनविरोध निवडणुकीत भाजपचे २, राजदचे २ आणि जदयूचा एक उमेदवार विजयी झाला. भाजपचे सतीशचंद्र दुबे, शंभू शरण पटेल, जदयूचे खीरू महतो, राजदकडून मीसा भारती, फैयाज अहमद यांचा समावेश आहे. तामिळनाडू : तामिळनाडूतून ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यात सत्ताधारी डीएमकेचे ३, अण्णाद्रमुकचे २ आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. डीएमकेचे एस. कल्याणसुंदरम, आर. गिरिराजन, केआरएन राजेश कुमार, अण्णाद्रमुकचे सी.व्ही. शनमुगम आणि आ. धर्मर व काँग्रेसचे पी. चिदंबरम यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील चारही जागांवर सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. या उमेदवारात व्ही. विजयसाई रेड्डी, बी. मस्तान राव, आर. कृष्णैया आणि एस. निरंजन रेड्डी यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे दोन, तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झालेला आहे. भाजपकडून कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मीकी तर, काँग्रेसकडून विवेक तन्खा बिनविरोध विजयी झाले आहेत. ओडिशा : ओडिशाच्या तीनही जागांवर बीजदचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात सुलाता देव, मानस रंजन मंगराज आणि सस्मित पात्रा यांचा समावेश आहे. तेलंगणा : तेलंगणातून टीआरएसचे के. बी. पार्थसारथी रेड्डी आणि डी. दामोदर राव बिनविरोध विजयी झाले आहेत. छत्तीसगड : छत्तीसगडमधून दोन्ही जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. राजीव शुक्ला आणि रंजित रंजन बिनविरोध निवडून आले आहेत. झारखंड : झारखंडमधून एक जागा झामुमोला तर एक जागा भाजपला मिळाली आहे. भाजपचे आदित्य साहू, तर झामुमोचे महुआ माजी विजयी झाले आहेत. पंजाब : पंजाबमधील दोन्ही जागा आपला मिळाल्या आहेत. बलबीर सिंग सीचेवाल आणि विक्रमजीत सिंग साहनी हे बिनविरोध निवडून आले आहेत. उत्तराखंड : उत्तराखंडची एकमेव जागा भाजपने बिनविरोध जिंकली आहे. भाजपच्या डॉ. कल्पना सैनी बिनविरोध निवडून आल्या आहेत.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक