शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

राजू शेट्टी जम्मू-काश्मीरला जाणार, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 18:24 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी जम्मूकाश्मीरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जाणार आहेत. 

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी जम्मूकाश्मीरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जाणार आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशातील विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी राजू शेट्टी दिल्लीत आले होते. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, तेथील शेतकऱ्यांची स्थिती अंत्यत गंभीर आहे. राज्यघटनेतील ३७० चे कलम रद्द केल्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद तुटला आहे. देशाला सफरचंद पुरविणाऱ्यां या प्रदेशातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांकडे २० लाख सफरचंद साठलेला आहे. हे सफरचंद घ्यायला कुणीही तयार नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण येत्या काही दिवसात जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. तेथील शेतकऱ्यांशी संवाद केल्यानंतर राज्य व केंद्र सरकारला त्याची माहिती देऊ. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल पत्र लिहिले आहे. परंतु कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांचे सर्व अर्थव्यवस्था एकाच पिकावर अवलंबून आहे. सफरचंदचे पीक घ्यायला कुणी व्यापारी तयार नसेल तर त्यांना मोबदला मिळणार नाही. सरकारने बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करावी नाहीतर राज्य वा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली.शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीमहाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष द्यायला राज्य व केंद्रातील नेत्यांना वेळ कुठे आहे? यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये महापुराने मोठे नुकसान झाले. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी वा केंद्रातील नेते आले नव्हते. केंद्र व राज्य दोन्ही सरकारला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नाही. काँग्रेसच्या सरकारला किमान शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती होती. शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवायला सुद्धा हे सरकार तयार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagricultureशेतीPoliticsराजकारणJammu Kashmirजम्मू-काश्मीर