शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

शहिदाच्या वडिलांचा उद्वेग; चर्चेतून तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 15:03 IST

युद्ध झाले तर निदान लोकांना पाकिस्तानला धडा शिकवल्याचे समाधान मिळेल.

काश्मीर: एकतर पाकिस्तानशी चर्चा करून कायमचा तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजौरी हल्ल्यातील शहीद हवालदार रोशन लाल यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराचा एक कॅप्टन व तीन जवान शहीद झाले होते. यामध्ये सीमारेषेलगतच्या सांबा आणि कटुआ या दोन गावांमधील जवानांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.या पार्श्वभूमीवर शहीद रोशन लाल यांचे वृद्ध वडील देशराज पराशर यांच्यासह गावकऱ्यांनी केंद्र सरकारकला एक संदेश पाठवला आहे. एकतर तुम्ही पाकिस्तानशी चर्चा करून कायमचा तोडगा काढा, नाहीतर एकदाचे युद्ध करून काश्मीरमध्ये कायमची शांतता प्रस्थापित करा, असे देशराज पराशर यांनी म्हटले. रोशन लाल यांचे चुलत भाऊ संजय यांनीही दोन्ही देशांमधील तणावामुळे सीमारेषेरवरील गावकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा मांडला. या सगळ्यावर युद्ध हा अंतिम तोडगा नाही, हे आम्हाला माहिती आहे. परंतु, दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावामुळे आमच्या आयुष्याला काहीच अर्थ उरलेला नाही. पाकिस्तानकडून गोळीबार होतो, मग आपले जवान त्याला प्रत्युत्तर देतात, हे नेहमीच सुरु असते. मात्र, या सगळ्यात आमच्या मुलांना जीव गमवावा लागत आहे. युद्ध झाले तर निदान लोकांना पाकिस्तानला धडा शिकवल्याचे समाधान मिळेल, असे त्यांनी सांगितले. शहीद रोशन लाल राहत असलेल्या नीचला या गावात 300 लोक राहतात. त्यापैकी 40 हून अधिकजण सैन्यात आहेत. रोशन लाल हे देशसेवा करताना शहीद झालेले गावातील पहिलेच जवान आहेत. तर येथूनच साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकूंदपूर येथील रायफलमन शुभम सिंह हेदेखील राजौरीमध्ये शहीद झाले होते. काही दिवसांतच त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न होणार होते. त्यासाठी त्यांच्या घराचे काम सुरू होते. हे काम बघायला शुभम सिंह एका महिन्याची सुट्टी काढून घरी परतले होते. 28 जानेवारीला ते पुन्हा कामावर रुजू झाले होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.   

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानSoldierसैनिक