शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शहिदाच्या वडिलांचा उद्वेग; चर्चेतून तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 15:03 IST

युद्ध झाले तर निदान लोकांना पाकिस्तानला धडा शिकवल्याचे समाधान मिळेल.

काश्मीर: एकतर पाकिस्तानशी चर्चा करून कायमचा तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजौरी हल्ल्यातील शहीद हवालदार रोशन लाल यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराचा एक कॅप्टन व तीन जवान शहीद झाले होते. यामध्ये सीमारेषेलगतच्या सांबा आणि कटुआ या दोन गावांमधील जवानांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.या पार्श्वभूमीवर शहीद रोशन लाल यांचे वृद्ध वडील देशराज पराशर यांच्यासह गावकऱ्यांनी केंद्र सरकारकला एक संदेश पाठवला आहे. एकतर तुम्ही पाकिस्तानशी चर्चा करून कायमचा तोडगा काढा, नाहीतर एकदाचे युद्ध करून काश्मीरमध्ये कायमची शांतता प्रस्थापित करा, असे देशराज पराशर यांनी म्हटले. रोशन लाल यांचे चुलत भाऊ संजय यांनीही दोन्ही देशांमधील तणावामुळे सीमारेषेरवरील गावकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा मांडला. या सगळ्यावर युद्ध हा अंतिम तोडगा नाही, हे आम्हाला माहिती आहे. परंतु, दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावामुळे आमच्या आयुष्याला काहीच अर्थ उरलेला नाही. पाकिस्तानकडून गोळीबार होतो, मग आपले जवान त्याला प्रत्युत्तर देतात, हे नेहमीच सुरु असते. मात्र, या सगळ्यात आमच्या मुलांना जीव गमवावा लागत आहे. युद्ध झाले तर निदान लोकांना पाकिस्तानला धडा शिकवल्याचे समाधान मिळेल, असे त्यांनी सांगितले. शहीद रोशन लाल राहत असलेल्या नीचला या गावात 300 लोक राहतात. त्यापैकी 40 हून अधिकजण सैन्यात आहेत. रोशन लाल हे देशसेवा करताना शहीद झालेले गावातील पहिलेच जवान आहेत. तर येथूनच साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकूंदपूर येथील रायफलमन शुभम सिंह हेदेखील राजौरीमध्ये शहीद झाले होते. काही दिवसांतच त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न होणार होते. त्यासाठी त्यांच्या घराचे काम सुरू होते. हे काम बघायला शुभम सिंह एका महिन्याची सुट्टी काढून घरी परतले होते. 28 जानेवारीला ते पुन्हा कामावर रुजू झाले होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.   

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानSoldierसैनिक