शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

'तुमच्या घरात घुसून मारू!' राजनाथ सिंह यांचा इशारा; आता पाकिस्तानने दिले उत्तर, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 14:16 IST

पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करू, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

Rajnath Singh on Pakistan: मोदी सरकारची दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. गेल्या दहा वर्षात सरकारने शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अशातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला इतकी मिरची लागली की, पाकने संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

एका मुलाखतीत राजनाथ सिंह यांना विचारण्यात आले होते की, ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'च्या वृत्तात भारतीय गुप्तचर संस्थांनी 2019 नंतर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला होता. तसेच, भारताने आपले ध्येय साध्य करण्यासाठी पाकिस्तानच्या स्थानिक गुन्हेगारांची मदत घेतल्याचेही म्हटले. यावर तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारल्याचे म्हटले. 

भारताला जबाबदार धरावे: पाकिस्तानसंरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन भारतावर अनेक आरोप केले. निवेदनात म्हटले की, भारतीय संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या वक्तव्याचा पाकिस्तान निषेध करतो. पाक सरकारने पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हत्यांसाठी भारताला जबाबदार धरले आणि त्याचे पुरावेही दिले. पाकिस्तानात घुसून लोकांना म्हटले जाते आणि ठार केले जाते, हा भारताच्या अपराधाचा पुरावा आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला या कृतींसाठी जबाबदार धरावे, असे पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे.

काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हत्याकांडावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण मंत्री म्हणाले होते की, आपल्या शेजारी देशातील कोणत्याही दहशतवाद्याने आपल्या भारताची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला किंवा भारतात दहशतवादी कारवाया केल्या, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. तो पाकिस्तानात पळून गेला, तरीदेखील आम्ही पाकिस्तानात घुसून त्याला ठार करू. सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याची ताकद भारताकडे आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद