शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'तुमच्या घरात घुसून मारू!' राजनाथ सिंह यांचा इशारा; आता पाकिस्तानने दिले उत्तर, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 14:16 IST

पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करू, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

Rajnath Singh on Pakistan: मोदी सरकारची दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. गेल्या दहा वर्षात सरकारने शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अशातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला इतकी मिरची लागली की, पाकने संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

एका मुलाखतीत राजनाथ सिंह यांना विचारण्यात आले होते की, ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'च्या वृत्तात भारतीय गुप्तचर संस्थांनी 2019 नंतर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला होता. तसेच, भारताने आपले ध्येय साध्य करण्यासाठी पाकिस्तानच्या स्थानिक गुन्हेगारांची मदत घेतल्याचेही म्हटले. यावर तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारल्याचे म्हटले. 

भारताला जबाबदार धरावे: पाकिस्तानसंरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन भारतावर अनेक आरोप केले. निवेदनात म्हटले की, भारतीय संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या वक्तव्याचा पाकिस्तान निषेध करतो. पाक सरकारने पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हत्यांसाठी भारताला जबाबदार धरले आणि त्याचे पुरावेही दिले. पाकिस्तानात घुसून लोकांना म्हटले जाते आणि ठार केले जाते, हा भारताच्या अपराधाचा पुरावा आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला या कृतींसाठी जबाबदार धरावे, असे पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे.

काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हत्याकांडावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण मंत्री म्हणाले होते की, आपल्या शेजारी देशातील कोणत्याही दहशतवाद्याने आपल्या भारताची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला किंवा भारतात दहशतवादी कारवाया केल्या, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. तो पाकिस्तानात पळून गेला, तरीदेखील आम्ही पाकिस्तानात घुसून त्याला ठार करू. सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याची ताकद भारताकडे आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद