शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'तुमच्या घरात घुसून मारू!' राजनाथ सिंह यांचा इशारा; आता पाकिस्तानने दिले उत्तर, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 14:16 IST

पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करू, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

Rajnath Singh on Pakistan: मोदी सरकारची दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. गेल्या दहा वर्षात सरकारने शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अशातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला इतकी मिरची लागली की, पाकने संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

एका मुलाखतीत राजनाथ सिंह यांना विचारण्यात आले होते की, ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'च्या वृत्तात भारतीय गुप्तचर संस्थांनी 2019 नंतर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला होता. तसेच, भारताने आपले ध्येय साध्य करण्यासाठी पाकिस्तानच्या स्थानिक गुन्हेगारांची मदत घेतल्याचेही म्हटले. यावर तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारल्याचे म्हटले. 

भारताला जबाबदार धरावे: पाकिस्तानसंरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन भारतावर अनेक आरोप केले. निवेदनात म्हटले की, भारतीय संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या वक्तव्याचा पाकिस्तान निषेध करतो. पाक सरकारने पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हत्यांसाठी भारताला जबाबदार धरले आणि त्याचे पुरावेही दिले. पाकिस्तानात घुसून लोकांना म्हटले जाते आणि ठार केले जाते, हा भारताच्या अपराधाचा पुरावा आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला या कृतींसाठी जबाबदार धरावे, असे पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे.

काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हत्याकांडावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण मंत्री म्हणाले होते की, आपल्या शेजारी देशातील कोणत्याही दहशतवाद्याने आपल्या भारताची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला किंवा भारतात दहशतवादी कारवाया केल्या, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. तो पाकिस्तानात पळून गेला, तरीदेखील आम्ही पाकिस्तानात घुसून त्याला ठार करू. सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याची ताकद भारताकडे आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद