शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:44 IST

Rajnath Singh Jammu Kashmir: 'यापुढे भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचे निमंत्रण मानले जाईल.'

Rajnath Singh Jammu Kashmir:ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी(15) जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचून जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा अणुबॉम्ब आयएईएच्या(IAEA) देखरेखीखाली आणण्याची मागणी केली. याशिवा त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, दोन्ही देशांनी युद्धविरामावार सहमती दर्शविली आहे. पण, पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचे नापाक कृत्य झाले, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. 

बेजबाबदार देशाच्या हातात अणुबॉम्ब सुरक्षित नाहीसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट दिली. यावेळी पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमकीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी जगासमोर हा प्रश्न उपस्थित करू इच्छितो की, IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) ने पाकिस्तानची अण्वस्त्रे आपल्या नियंत्रणात घ्यावीत. आम्हाला त्यांच्या अणुबॉम्ब धमकीची पर्वा नाही. अशा बेजबाबदार देशाच्या हातात अणुबॉम्ब सुरक्षित आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भारताची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न...पहलगाममधील दहशतवादी घटना घडवून भारताला दुखावण्याचा आणि भारताची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी भारताच्या डोक्यावर हल्ला केला, आम्ही त्यांच्या छातीवर जखमा केल्या. ऑपरेशन सिंदूर ही भारताने त्याच्या इतिहासातील दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. आज भारताने संपूर्ण जगाला हे स्पष्ट केले आहे की, आम्ही दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाऊ शकतो. 

...तर युद्धाचे निमंत्रण मानले जाईलतुम्हाला आठवत असेल की, सुमारे एकवीस वर्षांपूर्वी याच पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये अटलजींसमोर घोषणा केली होती की, त्यांच्या भूमीतून आता दहशतवाद निर्यात केला जाणार नाही. पण पाकिस्तानने भारताशी विश्वासघात केला आणि आजही केला जात आहे. आता त्याला याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. जर दहशतवाद सुरूच राहिला तर ही किंमत वाढतच जाईल. भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचे निमंत्रण मानले जाईल. आपल्या पंतप्रधानांनी हे देखील स्पष्ट केले आहे की दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत आणि जर संवाद असेल तर तो दहशतवाद आणि पीओकेवर असेल, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तान