शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Rajnath Singh: 'संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली', राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 17:15 IST

Rajnath Singh : 'मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे, त्यांना अशी वक्तव्ये शोभत नाही.'

Rajnath Singh: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समान नागरी संहिता कायद्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीशो बोलताना त्यांनी 'संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे,' असे वक्तव्य केले. यासह त्यांनी विविध विषयांवरही आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संरक्षण मंत्री ?यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'आता भारतात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी याचा विचार करावा. ज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली असेल किंवा करणार असतील, अशा राज्यांचे मी अभिनंदन करतो.' यावेळी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.'

गुजरातबाबत काय म्हणाले?गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, '2024कडे वाटचाल करत आहोत. फक्त गुजरातमध्येच नव्हे तर केंद्रातही मोदी सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारावर गुजरात जिंकतोय. पंतप्रधानांचे देशभरातील दौरे पहा, ते खूप मेहनत करतात. याचा परिणाम म्हणजे भारताची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे.'

खर्गेंच्या वक्तव्यावर नाराजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर संरक्षण मंत्री म्हणाले की, 'मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. राजकारणात प्रतिष्ठा असली पाहिजे, खर्गे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना अशी वक्तव्ये शोभत नाही. पंतप्रधान ही व्यक्ती नसून संस्था आहे, अशी विधाने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शोभत नाहीत. काँग्रेस हताश आणि हतबल झाल्याचे दिसत आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे