शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Rajnath Singh: 'संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली', राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 17:15 IST

Rajnath Singh : 'मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे, त्यांना अशी वक्तव्ये शोभत नाही.'

Rajnath Singh: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समान नागरी संहिता कायद्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीशो बोलताना त्यांनी 'संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे,' असे वक्तव्य केले. यासह त्यांनी विविध विषयांवरही आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संरक्षण मंत्री ?यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'आता भारतात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी याचा विचार करावा. ज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली असेल किंवा करणार असतील, अशा राज्यांचे मी अभिनंदन करतो.' यावेळी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.'

गुजरातबाबत काय म्हणाले?गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, '2024कडे वाटचाल करत आहोत. फक्त गुजरातमध्येच नव्हे तर केंद्रातही मोदी सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारावर गुजरात जिंकतोय. पंतप्रधानांचे देशभरातील दौरे पहा, ते खूप मेहनत करतात. याचा परिणाम म्हणजे भारताची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे.'

खर्गेंच्या वक्तव्यावर नाराजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर संरक्षण मंत्री म्हणाले की, 'मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. राजकारणात प्रतिष्ठा असली पाहिजे, खर्गे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना अशी वक्तव्ये शोभत नाही. पंतप्रधान ही व्यक्ती नसून संस्था आहे, अशी विधाने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शोभत नाहीत. काँग्रेस हताश आणि हतबल झाल्याचे दिसत आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे