शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:02 IST

Rajnath Singh India Pakistan: 'यापुढे पाकिस्तानसोबत जेव्हा-जेव्हा चर्चा होईल, तेव्हा फक्त पीओके आणि दहशतवादावर होईल.'

Rajnath Singh India Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. भारताकडूनपाकिस्तानला सातत्याने इशारे दिले जाताहेत. आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला थेट इशारा दिला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने खूप प्रगती केली आहे. आपली संरक्षण रचना पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. दहशतवादात सहभागी असलेल्यांना मोठी किंमत मोजावी लागेल,' असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधताना पीओकेचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'पीओकेमधील लोक आपले आहेत, त्यांना फक्त दिशाभूल केले जात आहे. पीओके आपलाच एक भाग आहे आणि मला विश्वास आहे की, एक दिवस पीओके स्वतःच भारतात सामील होण्यास तयार होईल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

पीओकेची तुलना महाराणा प्रताप यांच्याशी

राजनाथ सिंह म्हणाले, 'पीओके हे महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंहसारखे आहे. महाराणा प्रताप शक्ती सिंह यांच्याबद्दल म्हणायचे, आता वेगळे झाले असले तरी ते आमचे भाऊ आहेत. ते कुठेही गेले तरी आमच्याकडे परत येतील. त्याचप्रमाणे, पीओके काही काळापासून आमच्यापासून वेगळा झाला आहे, परंतु तो आपल्या भावाकडे परत येईल. पीओकेमध्ये राहणाऱ्या आमच्या भावांची परिस्थिती शूर योद्धा महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंह यांच्यासारखीच आहे.'

आता चर्चा फक्त दहशतवादावर राजनाथ सिंह पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेबाबत म्हणाले की, 'पाकिस्तानला हे समजले आहे की दहशतवादाला प्रोत्साहन देणे परवडणारे नाही. आता जेव्हा जेव्हा चर्चा होईल, तेव्हा ती पीओकेवर, दहशतवादावर असेल. आम्ही मोदीजींच्या एक भारत, महान भारताच्या संकल्पाशी वचनबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की, पीओकेतील लोक कधीतरी भारताच्या मुख्य प्रवाहात परत येतील.'

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तान