शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:02 IST

Rajnath Singh India Pakistan: 'यापुढे पाकिस्तानसोबत जेव्हा-जेव्हा चर्चा होईल, तेव्हा फक्त पीओके आणि दहशतवादावर होईल.'

Rajnath Singh India Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. भारताकडूनपाकिस्तानला सातत्याने इशारे दिले जाताहेत. आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला थेट इशारा दिला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने खूप प्रगती केली आहे. आपली संरक्षण रचना पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. दहशतवादात सहभागी असलेल्यांना मोठी किंमत मोजावी लागेल,' असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधताना पीओकेचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'पीओकेमधील लोक आपले आहेत, त्यांना फक्त दिशाभूल केले जात आहे. पीओके आपलाच एक भाग आहे आणि मला विश्वास आहे की, एक दिवस पीओके स्वतःच भारतात सामील होण्यास तयार होईल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

पीओकेची तुलना महाराणा प्रताप यांच्याशी

राजनाथ सिंह म्हणाले, 'पीओके हे महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंहसारखे आहे. महाराणा प्रताप शक्ती सिंह यांच्याबद्दल म्हणायचे, आता वेगळे झाले असले तरी ते आमचे भाऊ आहेत. ते कुठेही गेले तरी आमच्याकडे परत येतील. त्याचप्रमाणे, पीओके काही काळापासून आमच्यापासून वेगळा झाला आहे, परंतु तो आपल्या भावाकडे परत येईल. पीओकेमध्ये राहणाऱ्या आमच्या भावांची परिस्थिती शूर योद्धा महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंह यांच्यासारखीच आहे.'

आता चर्चा फक्त दहशतवादावर राजनाथ सिंह पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेबाबत म्हणाले की, 'पाकिस्तानला हे समजले आहे की दहशतवादाला प्रोत्साहन देणे परवडणारे नाही. आता जेव्हा जेव्हा चर्चा होईल, तेव्हा ती पीओकेवर, दहशतवादावर असेल. आम्ही मोदीजींच्या एक भारत, महान भारताच्या संकल्पाशी वचनबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की, पीओकेतील लोक कधीतरी भारताच्या मुख्य प्रवाहात परत येतील.'

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तान