शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 22:54 IST

Yaas Cyclone: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीनंतर आता टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देदेशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायीराजनाथ सिंहांनी अप्रत्यक्षरित्या ममता दीदींना सुनावले

नवी दिल्ली: पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर लगेचच पूर्व किनारपट्टीला यास चक्रीवादळ (Yass Cyclone) धडकले. यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील भागाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी दौरा केला. यानंतर आढावा बैठकही घेतली. मात्र, यावेळीही ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्रातील वाद शमलेला दिसला नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीनंतर आता टीका होण्यास सुरुवात झाली असून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या पंतप्रधानांसोबत असा व्यवहार वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. (rajnath singh criticised mamata banerjee over yaas cyclone meeting) 

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपला चीतपट करत तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. मात्र, तरीही ममता बॅनर्जी आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यातील वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी, राज्यपाल जयदीप धनखर यांना ताटकळत ठेवल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. 

“केंद्र सरकार कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतंय”

देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी

राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पश्चिम बंगालमधील आजचा घटनाक्रम धक्कादायक आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान व्यक्ती नसून संस्था आहेत. दोघांनी जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाबद्दल निष्ठा ठेवण्याची शपथ घेऊनच पदग्रहण केले आहे. संकटाच्या काळात जनतेला मदत देण्याच्या भावनेने आलेल्या पंतप्रधानांसोबत अशा प्रकारचा व्यवहार वेदनादायी आहे. जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाने दिलेल्या कर्तव्यांच्या वर राजकीय मतभेदांना ठेवण्याचे हे एक दुर्दैवी उदाहरण आहे. हे भारतीय संघव्यवस्थेच्या भावनेला धक्का पोहोचवणारे आहे, असे ट्विट राजनाथ सिंग यांनी करत ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. 

Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; PMO ची घोषणा

नेमके काय घडले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा हवाई पाहणी दौरा केला. यानंतर ते पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या पूर्वनियोजित बैठकीसाठी पोहोचले. मात्र, या बैठकीसाठी ममता बॅनर्जी तब्बल अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जगदीप धनकर यांना तब्बल अर्धा तास ममता बॅनर्जी यांची वाट पाहावी लागली, असे सांगितले जात आहे. राज्यपाल जगदीप धनखर यांनी या माहितीला दुजोरा देणारे ट्विट केले.

फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार

दरम्यान, यास चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड राज्यांना १ हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच या चक्रीवादळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना दोन लाख तसेच गंभीररित्या जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीRajnath Singhराजनाथ सिंहprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार