शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मोदींचा 'तो' दावा खोटा, नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने सांगितली INS ची 'विराट'कथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 15:39 IST

राजीव गांधींच्या हाँगकाँग दौऱ्यावेळीचा हा प्रसंग असून पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही असाच आयएनएस विराटचा दौरा केला होता.

नवी दिल्ली - निवृत्त व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच गांधी कुटुंबाने आएनएस विक्रांतवर अधिकृत दौऱ्यासाठी हजर होती. मात्र, राजीव गांधींसोबत कुठलेही परदेशी नागरिक किंवा त्यांचे नातेवाईक या दौऱ्यावर हजर नव्हते, असे नौदलाचे व्हाईस अॅडमिरल पसरिचा यांनी म्हटले आहे. पसरिचा यांच्या व्हिडीओचा संदर्भ देत मोदीचा दावा खोटा असल्याचं काँग्रसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे. 

राजीव गांधींच्या हाँगकाँग दौऱ्यावेळीचा हा प्रसंग असून पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही असाच आयएनएस विराटचा दौरा केला होता. त्यावेळी, त्यांच्यासमवेतही त्यांची मुले आणि नातवंडेही त्यांच्यासमेवत होती, असे पसरिचा यांनी म्हटले आहे. तसेच या दौऱ्यावेळी केवळ सोनिया आणि राजीव गांधींसाठीच हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. राहुल गांधींनी या हेलिकॉप्टरमधून प्रवास केला नसल्याचंही अॅडमिरल पसरिचा यांनी म्हटले आहे. विनोद पसरिचा यांच्या न्यूज चॅनेलवरील व्हिडीओचा संदर्भ देत खेरा यांनी मोदींचे दिल्लीच्या सभेतील वक्तव्य खोटे असून हेच खरं असल्याचे म्हटले आहे. तसेच, विनोद पसरिचा हे त्यावेळी लक्षद्वीप बेटावरील अॅडमिनिस्ट्रेटर होते, असेही खेरा यांनी आपल्या ट्विटरवर नमूद केले आहे.   

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानावरुन सभेला संबोधित करताना गांधी परिवारावर हल्लाबोल केला होता. दिल्लीतील सभेत मोदींनी पुन्हा एकदा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे नाव घेऊन काँग्रेसवर टीका केली. राजीव गांधींनी आयएनएस विराट या युद्धनौकेच्या अनावरणावेळी सासरच्यांचे लाड पुरवले, असा घणाघाती आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधीच्या सेवेसाठी नौदलाचा गैरवापर करण्यात आल्याचेही मोदींनी म्हटले.देशाच्या सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आयएनएस विराट युद्धनौका तैनात करण्यात येत होती. मात्र, पिकनिकसाठी जाणाऱ्या गांधी परिवाराच्या स्वागतासाठी ती युद्धनौका देण्यात आली. त्यावेळी, आयएनएस विराट 10 दिवस गांधी परिवार आणि नातेवाईकांना घेऊन पिकनिकसाठी पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधींसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी त्यांच्या सासरवाडीचेही लोक हजर होते. विदेशी नागरिकांना भारताच्या युद्धनौकेवरुन फिरवणे हा देशाच्या सुरक्षेशी खेळणं असंच नाही का? असा प्रश्नही मोदींनी विचारला होता. त्यानंतर काँग्रेसनेही यावरुन पलटवार देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता नौदलातील निवृत्त अधिकाऱ्यानेच याबाबत आपले मत मांडले असून असं काहीही घडलं नसल्याचे अॅडमिरल पसरिचा यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीindian navyभारतीय नौदलRajiv Gandhiराजीव गांधीSonia Gandhiसोनिया गांधी