शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

राजीव गांधी हत्याकांड! दोषींच्या सुटकेविरोधात केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:35 PM

सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्याकांडातील आरोपींची सुटका केली आहे.

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींना सोडण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सरकारने नलिनीसह सहा दोषींना शिक्षेतून सूट देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दोषींना सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर नलिनीसह सहा दोषींची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

राजीव गांधी हत्येप्रकरणी नलिनी आणि पी रविचंद्रन यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नलिनी, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यापूर्वी 18 मे 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील आणखी एका दोषी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी केली होती. न्यायालयाने हे मान्य केले की पेरारिवलन प्रकरणातील SC चा निर्णय उर्वरित 6 दोषींनाही लागू होतो.

काँग्रेसने निर्णयाला चुकीचे म्हटले राजीव गांधी हत्येतील दोषींच्या सुटकेला काँग्रेसने दुर्दैवी आणि चुकीचे म्हटले. दोषींना सोडले जाऊ नये असे काँग्रेसने म्हटले होते. ही हत्या माजी पंतप्रधानांशी संबंधित आहे, एखाद्या सामान्य व्यक्तीशी संबंधित नाही, असे काँग्रेसने म्हटले. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषींना सोडण्याच्या मुद्द्यावर मला यात कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले होते. पेरारिवलनच्या सुटकेवर राहुल यांनी हे वक्तव्य केले.

नलिनीला भेटल्यावर प्रियांका रडत होतीसुप्रीम कोर्टातून सुटका झाल्यानंतर दोषींपैकी एक असलेल्या नलिनीने सरकारचे आभार मानले. तमिळनाडूच्या जनतेचेही तिने आभार मानले. काँग्रेस नेत्या आणि राजीव गांधी यांची कन्या प्रियांका गांधीही 2008 मध्ये तुरुंगात नलिनी यांना भेटायला गेल्या होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नलिनीने सांगितले की, प्रियंका तिच्यासमोर रडत होत्या. नलिनीने राजीव गांधींच्या हत्येशी संबंधित सर्व गोष्टी प्रियांकाला सांगितल्या होत्या.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय